Astrology:१५ जूनला सूर्य-गुरूची युती, या ५ राशींना अचानक होऊ शकतो धनलाभ

  147

मुंबई: १५ जूनला सूर्य देवता मिथुन राशीत प्रवेश करत आहे. या राशीमध्ये गुरू आधीपासूनच विराजमान आहे. मिथुन राशीमध्ये सूर्य-गुरूच्या युतीमुळे गुरू आदित्य राजयोग निर्माण होईल. गुरू हा सूर्याचा मित्र ग्रह मानला जातो.


ज्योतिषशास्त्रात गुरू आदित्य योग अतिशय शुभ मानला जातो. असे म्हणतात की हा योग व्यक्तीच्या जीवनात ज्ञान, धन, यश, मान-सन्मान आणि सुख-समृद्धी घेऊन येतो.


सूर्य गुरू ग्रहाच्या युतीमुळे अनेक राशींना लाभ होणार आहे तसेच काही राशींच्या जीवनात आनंदीआनंद येणार आहे.



वृषभ


गुरू आदित्य योगमुळे वृषभ राशीच्या लोकांना शुभ समाचार मिळेल. आर्थिक कामांमध्ये प्रगती होईल. पगार वाढण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करू शकाल.



सिंह


गुरू आदित्य योगामुळे सिंह राशीच्या लोकांचे प्रगतीचे मार्ग खुले होतील. या शुभ योगामुळे लाभ होतील. धनलाभाचे चांगले योग बनत आहेत. नशिबाची संपूर्ण साथ मिळेल.



कन्या


या शुभ योगामुळे कन्या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढेल. अडकलेले पैसे प्राप्त होतील. ज्यांना नोकरी मिळत नाही आहे त्यांना चांगला जॉब मिळेल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल.



कुंभ


कुंभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. मान-सन्मान वाढेल. आरोग्य चांगले राहील. मित्र परिवार आणि नातेवाईकांची साथ लाभेल. वारसा संपत्तीचा लाभ होईल. धन खर्च वाढेल.



मीन


मीन राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात आवड वाढेल. नोकरी-व्यापारात मोठा फायदा होईल. मुलांसाठीही हा काळ चांगला आहे. एखादी खुशखबर मिळेल. नशिबाची संपूर्ण साथ लाभेल.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली