Air Indiaकडून प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी विशेष मदत उड्डाणांची व्यवस्था

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये Air India च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर, Air India ने प्रवाशांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष मदत उड्डाणांची घोषणा केली आहे. या विशेष फ्लाइट्स दिल्लीतून आणि मुंबईहून थेट अहमदाबादसाठी रवाना होणार आहेत.


या विशेष उड्डाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे:


दिल्लीहून अहमदाबादसाठी – फ्लाइट क्रमांक IX1555
वेळ: १२ जून, रात्री ११:०० वाजता


अहमदाबादहून दिल्लीसाठी – फ्लाइट क्रमांक IX1556
वेळ: १३ जून, रात्री १:१० वाजता


मुंबईहून अहमदाबादसाठी – फ्लाइट क्रमांक AI1402
वेळ: १२ जून, रात्री ११:०० वाजता


अहमदाबादहून मुंबईसाठी – फ्लाइट क्रमांक AI1409
वेळ: १३ जून, रात्री १:१५ वाजता


हे उड्डाण फक्त प्रवाशांचे नातेवाईक आणि Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत, जे आपल्या प्रियजनांच्या मदतीसाठी किंवा माहिती घेण्यासाठी अहमदाबादला जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


Air India ने दिल्लीत व मुंबईत असणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.


१८०० ५६९१ ४४४ - भारतातील कॉलसाठी (विशेषतः दिल्ली व मुंबईमधील लोकांसाठी)
+९१ ८०६२७७९२०० - आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी


या विशेष फ्लाइट्समुळे अपघातग्रस्त प्रवाशांचे कुटुंबीय लवकरात लवकर अहमदाबादला पोहोचू शकतील आणि आपल्या नातेवाईकांची स्थिती जाणून घेऊ शकतील. या संकटकाळात Air India कडून ही एक महत्त्वाची आणि संवेदनशील पावले उचलण्यात आली आहेत.


या भीषण घटनेनंतर अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर Air India कडून सुरू करण्यात आलेल्या मदतीच्या प्रयत्नांमुळे प्रभावित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची