Air Indiaकडून प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी विशेष मदत उड्डाणांची व्यवस्था

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये Air India च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर, Air India ने प्रवाशांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष मदत उड्डाणांची घोषणा केली आहे. या विशेष फ्लाइट्स दिल्लीतून आणि मुंबईहून थेट अहमदाबादसाठी रवाना होणार आहेत.


या विशेष उड्डाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे:


दिल्लीहून अहमदाबादसाठी – फ्लाइट क्रमांक IX1555
वेळ: १२ जून, रात्री ११:०० वाजता


अहमदाबादहून दिल्लीसाठी – फ्लाइट क्रमांक IX1556
वेळ: १३ जून, रात्री १:१० वाजता


मुंबईहून अहमदाबादसाठी – फ्लाइट क्रमांक AI1402
वेळ: १२ जून, रात्री ११:०० वाजता


अहमदाबादहून मुंबईसाठी – फ्लाइट क्रमांक AI1409
वेळ: १३ जून, रात्री १:१५ वाजता


हे उड्डाण फक्त प्रवाशांचे नातेवाईक आणि Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत, जे आपल्या प्रियजनांच्या मदतीसाठी किंवा माहिती घेण्यासाठी अहमदाबादला जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


Air India ने दिल्लीत व मुंबईत असणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.


१८०० ५६९१ ४४४ - भारतातील कॉलसाठी (विशेषतः दिल्ली व मुंबईमधील लोकांसाठी)
+९१ ८०६२७७९२०० - आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी


या विशेष फ्लाइट्समुळे अपघातग्रस्त प्रवाशांचे कुटुंबीय लवकरात लवकर अहमदाबादला पोहोचू शकतील आणि आपल्या नातेवाईकांची स्थिती जाणून घेऊ शकतील. या संकटकाळात Air India कडून ही एक महत्त्वाची आणि संवेदनशील पावले उचलण्यात आली आहेत.


या भीषण घटनेनंतर अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर Air India कडून सुरू करण्यात आलेल्या मदतीच्या प्रयत्नांमुळे प्रभावित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे