Ahmedabad Plane Crash: विमान अपघातात २४२ हून अधिक मृत्युंची शक्यता! चालू आहे चौकशी सगळ्या घडामोडी इत्यंभूत जाणून घ्या......

  74

अहमदाबाद: आज अहमदाबाद विमान अपघातात १२० हून अधिक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा भारताच्या विमान अपघात इतिहासातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक घटना मानली जात आहे. गुरूवारी दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. २४२ प्रवासी असलेले विमान अहमदाबादकडून उड्डाण घेत लंडनकडे निघालेले असताना विमानतळापासून ५ मिनिटांत टेक ऑफ केलेल्या व मेघानीनगर विमानतळापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जागेवर ही दुर्घटना घडली होती. यानंतर अग्निशामक दलाचे अधिकारी जयेश खडिया आपल्या टीमबरोबर घटनास्थळी पोहोचले होते.


या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमानाला आग लागली. त्यामुळे धुराचे लोट आसपास पसरले होते. अजूनही नेमके किती लोक खाली ढिगाऱ्याखाली अडकले आहेत याचा शोध यंत्रणांकडून सुरू आहे. अपघात झालेले विमान २००९ साली सुरू झालेले बोईंग ७८७ ड्रिमलाईनर प्रकारचे विमान होते.या घटनेनंतर विविध स्तरांवर मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली देत असताना एअर इंडिया कंपनीचे मुख्य नटराजन चंद्रशेखरन यांनी पिडित व मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही आमची प्रथम प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.एक्सवर या भावना त्यांनी व्यक्त केल्या. नागरी विमान वाहतूक संचनालय (The Directorate General of Civil Aviation) विभागाने या विमानाला धोक्याची घंटा वर्तवली होती. त्यानंतर काहीच दिवसात हा अपघात घडला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे विमान सक्षम नसताना हे विमान प्रवासी वाहतूकीसाठी का सुरू ठेवले गेले याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


अहमदाबादच्या सिटी इस्पितळात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी या अपघातात २४२ प्रवासी दगावले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.याबद्दल अजून नेमका आकडा कळला नसला तरी झालेली जिवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे इतके स्पष्ट आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनीही आपली घडलेल्या घटनेवर संवेदना व्यक्त केली आहे. माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.


धक्कादायक बाब म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी देखील या विमानातून प्रवास करत होते. याबाबतची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते भुपेंद्रसिंग चुदासमा यांनी दिली होती. सोशल मीडियावर त्यांच्या पासपोर्टचा फोटो वायरल झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान जमिनीपासून ८२५ फूटावर असताना विमानाचा तोल गेला व विमान कोसळले. हे विमान मेडिकल कॉलेजवर कोसळल्याने पाच विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. याबद्दल एअर इंडियाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'अहमदाबाद-लंडन गॅटविकवर चालणारी फ्लाइट AI171, आज, १२ जून २०२५ रोजी एका घटनेत सामील होती. सध्या आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरात लवकर पुढील अपडेट्स शेअर करू'


यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Disaster Management) अलर्ट जारी केला असून त्यांनी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत हे कार्य सुरू केले आहे. संकटाच्या काळात ०११-२४६१०८४३, ९६५०३९१८५९ हे क्रमांक जनसामान्यांना संपर्कासाठी देण्यात आले आहेत.


फेडरेशन ऑल इंडिया मेडिकल असोसिएशकडून रक्तदानाचे आवाहन -


FAIMA या संस्थेकडून पिडितांसाठी रक्तदानाचे करण्यात येत आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार,५० ते ६० एमबीबीएस विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले आहे.तरी गरजूंना रक्तदान करून मदत करावी ही विनंती संस्थेकडून करण्यात आली आहे.


FAIMA ने त्यांच्याद्वारे उघडलेल्या रक्त केंद्रांची माहिती दिली आहे:१.यू.एन.मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर.रूम क्रमांक ११०, पहिला मजला,ए ब्लॉक.संपर्क क्रमांक -९३१६७३२५२४


२.आयएचबीटी विभाग,सिव्हिल हॉस्पिटल.दुसरा मजला,१२०० बेड असलेले सिव्हिल हॉस्पिटल. संपर्क क्रमांक- ९४२८२६५४०९


३. आयकेडीआरसी ब्लड सेंटर.पहिला मजला,आयकेडीआरसी हॉस्पिटल,मंजुश्री मिल रोड,बलिया लिमडी.संपर्क क्रमांक- ०७९२२६८७५००.विस्तार क्रमांक- ४२२६


४. जीसीआरआय ब्लड सेंटर.पहिला मजला,गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट.संपर्क क्रमांक- ०७९२२६८८०२६.


यापूर्वीही घडले आहेत असे अपघात !


मुंबई ७ जुलै १९६२ घाटकोपर


१ जानेवारी १९७८ सांताक्रूझ


२१ जून १९८२ भोपाळ विमानतळ


१४ फेब्रुवारी १९९० बंगळुरू


१६ ऑगस्ट १९९१ भुवनेश्वर


आजच्या अपघाताचे अद्याप नक्की कारण समोर आलेले नाही. मात्र सरकार या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची शक्यता आहे.भारतीय हवाई क्षेत्रात विमाने चालवताना होणाऱ्या सुरक्षिततेच्या घटनांचे अपघात आणि गंभीर घटनांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी AAIB जबाबदार आहे. ते अपघातांची सविस्तर चौकशी करते आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी उपाययोजना देखील सुचवते.


मृतांची यादी

Comments
Add Comment

बिअर पिण्यात यूपीचे अलिगड अव्वल

अलिगड : बिअर पिण्याच्या बाबतीत तुम्ही कोणत्या राज्याला किंवा शहराला नंबर १ म्हणाल? दिल्ली एनसीआर की नोएडा की

NEET UG 2025 Result : NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर, या लिंकवरून निकाल आणि अंतिम उत्तरपत्रिका तपासा

NTA ने शनिवारी म्हणजेच १४ जून रोजी NEET UG परीक्षा २०२५ (NEET UG निकाल २०२५ बाहेर) चा निकाल जाहीर केला आहे. निकालापूर्वी NTA कडून

भारतीय अंतराळवीर १९ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना होणार

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन

जळालेले मालवाहक जहाज टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले

कोची : सिंगापूरचा झेंडा लावलेले एमव्ही वान है ५०३ हे जहाज भारताच्या तटरक्षक दलाने टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले.

दिल्ली: जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीला आग

नवी दिल्ली : जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तेरा गाड्या

सांगलीत ड्रगचा कारखाना चालवणाऱ्याला UAE मध्ये पकडले, भारतात आणले

नवी दिल्ली : भारतामध्ये महाराष्ट्रात सांगली येथे सिंथेटिक ड्रग तयार करण्याचा कारखाना चालवणारा ताहेर सलीम डोला