Ahmedabad plane crash: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीसह २४२ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील सात प्रवाशांचा समावेश

हॉस्टेल इमारतीवर विमान आदळल्याने विद्यार्थीसह अनेक जखमी


अहमदाबाद : गुजरातमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI 171 विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. मात्र टेक-ऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच, केवळ ६२५ फूट उंचीवर असताना मेघानीनगर भागात हे विमान कोसळले. एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत किमान २४२ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले असून महाराष्ट्रातील सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच २० वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, सीआरपीएफ तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे.


विमानातील एकूण २४२ प्रवाशांमध्ये, १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. या शिवाय १२ क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहितीनुसार यामध्ये २ नवजात बाळ, ११ लहान मुले, २१७ प्रौढ प्रवासी प्रवास करत होते.


या अपघातात बी.जे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जेवत असलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांवरही मोठा आघात झाला. हॉस्टेल इमारतीवर विमान आदळल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले. भारतीय वैद्यकीय संघटनेनुसार, यामध्ये तीन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे ४५ विद्यार्थी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत २० वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे.


अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्राचेही सात प्रवासी उपस्थित होते. यामध्ये चार केबिन क्रू आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : अपर्णा महाडिक (खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल यांची पत्नी आहेत.) महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि शनी सोंघरे. याशिवाय, राजस्थानमधील पाच प्रवाशांचाही या अपघातात मृत्यू झाला.


अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी अधिकृतरित्या २०४ मृतांची संख्या जाहीर केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.


या दुर्घटनेनंतर गुजरात आरोग्य विभागाने नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलतर्फे 6357373831 आणि 6357373841 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच, BJ मेडिकलमध्ये डीएनए चाचणी सुरू असून नातेवाईकांना डीएनए नमुने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मृतांची ओळख पटवणे सुलभ होईल.


या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले. राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही दु:खद माहिती शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, "विजय रूपाणी यांचे अकाली निधन ऐकून सुन्न झालो आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना."


संपूर्ण देशात या दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विविध नेत्यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ