वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरची सफर आता फक्त ३ तासांत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ जून रोजी काश्मीरसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि ७ जूनपासून ही ट्रेन नियमितपणे सुरू झाली आहे. ही वेगवान वंदे भारत एक्स्प्रेस श्री माता वैष्णो देवी कटरा स्थानकावरून श्रीनगरपर्यंत धावते. या मार्गामध्ये केवळ बनिहाल येथे एकमेव थांबा आहे आणि संपूर्ण प्रवास फक्त ३ तासांत पूर्ण होतो.



जर तुम्ही वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन (www.irctc.co.in) एसव्हीडीके ते सिना या स्टेशन कोडनुसार तिकीट बुक करावे लागेल. हे अनुक्रमे कटरा व श्रीनगरसाठीचे कोड आहेत. तुम्हाला तारीख निवडून ट्रेनची यादी पाहायला मिळेल. त्यानंतर AVL (Available) असलेल्या ट्रेनवर क्लिक करून प्रवास तपशील तपासावा. तुमचे नाव, वय, मोबाईल क्रमांक व अन्य आवश्यक माहिती भरून, UPI/कार्डद्वारे पेमेंट करून तिकीट बुक करता येते. पहिली ट्रेन – कटरा येथून सकाळी ८.१० वाजता सुटते आणि ११.१० वाजता श्रीनगर येथे पोहोचते.

जम्मू-काश्मीरमध्ये आता एकूण ४ वंदे भारत ट्रेन


दिल्लीहून कटऱ्यापर्यंत दोन वंदे भारत ट्रेन चालतात. या व्यतिरिक्त, आता कटडा ते श्रीनगरदरम्यानही दोन वंदे भारत ट्रेन उपलब्ध असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये
एकूण चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

दिल्ली ते कटरा प्रवासाला सुमारे ८ तास आणि कटरा ते श्रीनगर प्रवासाला फक्त ३ तास लागतात. त्यामुळे आता प्रवाशांसाठी जम्मू-काश्मीरचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे.
Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध