वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरची सफर आता फक्त ३ तासांत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ जून रोजी काश्मीरसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि ७ जूनपासून ही ट्रेन नियमितपणे सुरू झाली आहे. ही वेगवान वंदे भारत एक्स्प्रेस श्री माता वैष्णो देवी कटरा स्थानकावरून श्रीनगरपर्यंत धावते. या मार्गामध्ये केवळ बनिहाल येथे एकमेव थांबा आहे आणि संपूर्ण प्रवास फक्त ३ तासांत पूर्ण होतो.



जर तुम्ही वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन (www.irctc.co.in) एसव्हीडीके ते सिना या स्टेशन कोडनुसार तिकीट बुक करावे लागेल. हे अनुक्रमे कटरा व श्रीनगरसाठीचे कोड आहेत. तुम्हाला तारीख निवडून ट्रेनची यादी पाहायला मिळेल. त्यानंतर AVL (Available) असलेल्या ट्रेनवर क्लिक करून प्रवास तपशील तपासावा. तुमचे नाव, वय, मोबाईल क्रमांक व अन्य आवश्यक माहिती भरून, UPI/कार्डद्वारे पेमेंट करून तिकीट बुक करता येते. पहिली ट्रेन – कटरा येथून सकाळी ८.१० वाजता सुटते आणि ११.१० वाजता श्रीनगर येथे पोहोचते.

जम्मू-काश्मीरमध्ये आता एकूण ४ वंदे भारत ट्रेन


दिल्लीहून कटऱ्यापर्यंत दोन वंदे भारत ट्रेन चालतात. या व्यतिरिक्त, आता कटडा ते श्रीनगरदरम्यानही दोन वंदे भारत ट्रेन उपलब्ध असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये
एकूण चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

दिल्ली ते कटरा प्रवासाला सुमारे ८ तास आणि कटरा ते श्रीनगर प्रवासाला फक्त ३ तास लागतात. त्यामुळे आता प्रवाशांसाठी जम्मू-काश्मीरचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे.
Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे