घणसोलीच्या गवळीदेव परिसरात पर्यटनाला बंदी

विकासकामांमुळे प्रशासनाचा निर्णय; पर्यटकांमध्ये नाराजी


वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गवळीदेव परिसराचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे गवळीदेव परिसरात पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.



फेसाळलेला धबधबा, हिरवाईने नटलेला डोंगर असे वर्णन गवळीदेव परिसराचे केले जाते. घणसोली शहराच्या पूर्व सीमेवर कल्याण आणि नवी मुंबईच्या मध्यभागी ‘घणसोलीचा वॉटरफॉल’ म्हणजेच ‘गवळीदेव धबधबा’ पर्यटनस्थळ मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. गवळीदेव धबधब्याला येथील नागरिक ‘घणसोली टेकडी’ही म्हणतात. एका बाजूला औद्योगिक परिसर असल्याने या ठिकाणी धबधबा असेल, असे कुणाला वाटणारही नाही; मात्र हा डोंगर जसजसे आपण वर चढत जातो, तसतशी येथील निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईचे दर्शन होत जाते. काहीसा डोंगर चढल्यानंतर समोर दिसतो तो उंच कड्यावरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा. या धबधब्यावर येण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळ्यात असते. अन्यथा, इतर ऋतुमध्ये हा धबधबा एक शांत टेकडी म्हणून ओळखली जाते. हिवाळा आणि उन्हाळ्यात सभोवतालचे जंगल क्षेत्र फिरता येऊ शकते.


गवळीदेव पर्यटनस्थळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडला होता. अखेर वनविभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. पालिकेने या आधी गवळीदेव पर्यटनस्थळाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, दीपस्तंभ उभे केले आहे; मात्र आता पालिकेकडून गवळीदेव पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था, डोंगर कड्यांना संरक्षण कठडे, डोंगर माथ्यावर चढण्यासाठी आकर्षक पायऱ्या, विहिरी, तलावांची स्वच्छता, पर्यटन विश्रांती कक्ष, थकलेल्या पर्यटकांसाठी आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी बसण्याची व्यवस्था, पक्षीप्रेमींसाठी माहिती फलक, पथदिवे, कचराकुंडी, ठिकठिकाणी देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या ठिकाणी पालिकेकडून ही कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.

Comments
Add Comment

Airoli Murder Mystery : ११ महिने पचवला मर्डर, पण 'त्या' एका चुकीने खेळ खल्लास! ऐरोलीतील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश

नवी मुंबई : सिया आणि केतन या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा अद्याप ताजी असतानाच, नवी मुंबईतील ऐरोली (Navi Mumbai) परिसरातून

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून औषधांच्या आयातीस परवानगी

- औषधांच्या आयातीसाठी अधिसूचित प्रवेश बंदरांची एकूण संख्या ४२ वर नवी दिल्ली : औषध पुरवठा साखळी बळकट करण्याच्या

Horrific accident in Navi Mumbai : तळोजा येथे भरधाव कारने १० जणांना उडवले; २ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नवी मुंबई: नवी मुंबईतील तळोजा परिसरात आज मंगळवारी, ७ जुलै २०२६ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक

Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील

Chandrashekhar Bawankule : मुद्रांक शुल्क घोटाळ्यावर सरकारचा मोठा दणका; राज्यभरातील ५ वर्षांच्या प्रकरणांची विशेष चौकशी

हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली;