WTC Final सुरू होण्याआधीच MCC ला ४५ कोटी रुपयांचे नुकसान

लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final सुरू झाली. पण हा सामना सुरू होण्याआधीच लॉर्ड्सचे मैदान ज्यांच्या मालकीचे आहे त्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला चार मिलियन पाऊंड्स म्हणजेच जवळपास ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला नाही. यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी निराश झाले. याचा फटका बसला आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला तिकिटांच्या दरात कपात करावी लागली. जी तिकिटे आधीच विकली होती ती विकत घेणाऱ्यांना किंमत कमी केल्यामुळे निर्माण झालेल्या फरकाची रक्कम देण्यात आली. या संपूर्ण व्यवहारात मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

आयसीसीने २०२३ ते २०२५ दरम्यानच्या कसोटी मालिकांचा विचार करुन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी २०२३ ते २०२५ दरम्यान खेळलेल्या मालिकांतील जिंकण्याचे प्रमाण टक्केवारीच्या स्वरुपात सर्वोत्तम असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल हे निश्चित होते. भारताने आधीच्या दोन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे भारत हॅटट्रिक करेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण भारतीय संघ घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हरला. नंतर ऑस्ट्रेलियात जाऊन भारत खेळला. तिथे भारताचा ३-१ असा पराभव झाला. या दोन मालिकांतील पराभवांमुळे भारताच्या विजयाची टक्केवारी घसरली आणि हॅटट्रिक हुकली. याचा फटका मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला बसला.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ - २०२५
संघ - जिंकण्याचे प्रमाण (टक्केवारी)

  1. दक्षिण आफ्रिका - ६९.४४

  2. ऑस्ट्रेलिया - ६७.५४

  3. भारत - ५०

  4. न्यूझीलंड - ४८.२१

  5. इंग्लंड - ४३.१८

  6. श्रीलंका - ३८.४६

  7. बांगलादेश - ३१.२५

  8. वेस्ट इंडिज - २८.२१

  9. पाकिस्तान - २७.९८

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण