WTC Final सुरू होण्याआधीच MCC ला ४५ कोटी रुपयांचे नुकसान

लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final सुरू झाली. पण हा सामना सुरू होण्याआधीच लॉर्ड्सचे मैदान ज्यांच्या मालकीचे आहे त्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला चार मिलियन पाऊंड्स म्हणजेच जवळपास ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला नाही. यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी निराश झाले. याचा फटका बसला आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला तिकिटांच्या दरात कपात करावी लागली. जी तिकिटे आधीच विकली होती ती विकत घेणाऱ्यांना किंमत कमी केल्यामुळे निर्माण झालेल्या फरकाची रक्कम देण्यात आली. या संपूर्ण व्यवहारात मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

आयसीसीने २०२३ ते २०२५ दरम्यानच्या कसोटी मालिकांचा विचार करुन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी २०२३ ते २०२५ दरम्यान खेळलेल्या मालिकांतील जिंकण्याचे प्रमाण टक्केवारीच्या स्वरुपात सर्वोत्तम असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल हे निश्चित होते. भारताने आधीच्या दोन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे भारत हॅटट्रिक करेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण भारतीय संघ घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हरला. नंतर ऑस्ट्रेलियात जाऊन भारत खेळला. तिथे भारताचा ३-१ असा पराभव झाला. या दोन मालिकांतील पराभवांमुळे भारताच्या विजयाची टक्केवारी घसरली आणि हॅटट्रिक हुकली. याचा फटका मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला बसला.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ - २०२५
संघ - जिंकण्याचे प्रमाण (टक्केवारी)

  1. दक्षिण आफ्रिका - ६९.४४

  2. ऑस्ट्रेलिया - ६७.५४

  3. भारत - ५०

  4. न्यूझीलंड - ४८.२१

  5. इंग्लंड - ४३.१८

  6. श्रीलंका - ३८.४६

  7. बांगलादेश - ३१.२५

  8. वेस्ट इंडिज - २८.२१

  9. पाकिस्तान - २७.९८

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना