WTC Final : ट्रॅव्हिस हेडचा व्हेरेन बोल्डने घेतलेला थरारक झेल, कॅचचा Viral Video

लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवार ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final सुरू झाली. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज अवघ्या ६७ धावांत परतले. उस्मान ख्वाजा शून्य धावा करुन रबाडाच्या चेंडूवर बेडिंगहॅमकडे झेल देऊन परतला. मार्नस लाबुशेन १७ धावा करुन मार्को जॅनसेनच्या चेंडूवर व्हेरेनकडे झेल देऊन परतला. कॅमेरॉन ग्रीन चार धावा करुन रबाडाच्या चेंडूवर मार्करामकडे झेल देऊन परतला. ट्रॅव्हिस हेड ११ धावा करुन मार्को जॅनसेनच्या चेंडूवर व्हेरेनकडे झेल देऊन परतला. ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज लवकर बाद झाले. पण चर्चा सुरू आहे ती ट्रॅव्हिस हेड कसा झेलबाद झाला याचीच.

मार्को जॅनसेनने टाकलेला चेंडू वाईड जात आहे असे वाटत होते. पण अखेरच्या क्षणी ट्रॅव्हिस हेडने चेंडू फटकावला. ही ट्रॅव्हिस हेडने केलेली मोठी चूक होती. कारण ट्रॅव्हिस हेडने फटकावलेला चेंडू व्हेरेनने झेलला. व्हेरेनने एक सुंदर झेल घेतला. या झेलचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.