कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी-सुविधांचा अभाव

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ग्राहक विक्रेते हैराण


कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पसरलेले कचऱ्याचे ढिगारे आणि काही भागातील चिखलमय रस्ता पाहता तसेच कचऱ्याच्या सुटलेल्या दुर्गंधीमुळे फुलभाज्या, फळ भाज्या, तसेच फळे-फुले खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना डंपिंग ग्राऊंडवर आल्याचा भास होत आहे.


कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दररोज साधरण लहान मोठ्या सुमारे १०० हून अधिक गाड्यांमधून शेतकरी मालाची आवक होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी-सुविधांचा अभाव पाहता शेतकरी शेडमधील तरकारी घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखल युक्त रस्त्यातून मार्ग काढीत खरेदी करावी लागत आहे. फुल मार्केटचे केडीएमसी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे भिजत घोंगडे कायम असून तोडलेल्या फुल मार्केट समोर तात्पुरती शेड उभारून त्यातच फुल मार्केट सुरू आहे. फुल मार्केट लगतच्या रोडलगत कुजलेल्या फुलांच्या कचऱ्यांचे ढिगारे पाहता, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अस्वच्छता ही संभाव्य रोगराईला कारणीभूत ठरू शकते.


याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय ऐडगे यांनी सांगितले की, संदर्भीत कचरा उचलण्यासाठी प्रतिमाह साडे आठ लक्ष रू. ठेकेदाराला देत असून तो कचरा शहराबाहेर त्यांच्या खासगी जागेत डंपरने नेतो. बाजार समिती केडीएमसीला सुमारे ७० लक्ष कर भरते. तसेच गाळेधारक देखील मनपाला टॅक्स भरतात. पंरतु कचरा, दिवाबत्ती आदी सुविधांबाबत मनपा काही एक करीत नाही. फक्त टॅक्स घेते तर केडीएमसीच्या अख्यारितील फुल मार्केटचा कचरा देखील आम्हीच उचलतो.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर सद्यस्थितीत प्रशासकीय राजवट असून, २९ जून रोजी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूका होत आहेत. याकडे राजकीय क्षेत्रातील दिग्गाजांचे लक्ष असून, आजी, माजी संचालक देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कृषी उत्पन्न बाजार समितीतील अस्वच्छता, सोयी-सुविधांचा अभाव, कचऱ्याचे ढिगारे हा मुद्दा देखील यानिमित्ताने प्रचाराचा मुद्दा बनल्याचे दिसून आले आहे.


याबाबत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, बाजार समिती आवारात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम असून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कचऱ्यामुळे, अस्वच्छेतेमुळे संभाव्य नागरी आरोग्य प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत सूचना करणार आहे. एकीकडे मनपा क्षेत्रातील वाढीव शुल्क कमी होण्यासाठी राजकीय पक्षांचा एल्गार सुरू असताना केडीएमसी क्षेत्रातून बाजार समितीची कचरा वाहतूक होत आहे. ती शास्त्रीय मापदंडानुसार होते की नाही, हे पाहत कचरा वाहतूक शुल्क आकारणी मनपा का करीत नाही? असा सवाल जाणकारांकडून यानिमित्ताने होत आहे.

Comments
Add Comment

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका ठाणे : अमेरिकेचे

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या