इंदोर : सोनमच्या भावाने घेतली राजाच्या आईची भेट

  84

बहिणीच्या कृत्याबद्दल मागितली माफी


इंदोर : इंदोरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशी हिचा भाऊ गोविंद याने आज, बुधवारी इंदोरला जाऊन मृत जावयाच्या कुटुंबियांची भेट घेतली. आपली बहिणच मारेकरी असून तिच्या कृत्याबद्दल गोविंदने माफी मागितली. तसेच सोनमला फाशी व्हावी यासाठी लढू असे देखील त्याने सांगितले.


गोविंदने दिवंगत राजाची आई उमा देवीं यांना सांगितले की तो गाझीपूर (उत्तर प्रदेश) मध्ये सोनमला फक्त 2 मिनिटे भेटू शकला कारण पोलिस त्यांना भेटू देत नव्हते. दरम्यान, गोविंदने त्याची बहीण सोनमला विचारले, "तू या हत्येत सहभागी आहेस का?" सुरुवातीला सोनमने ते नाकारले, पण जेव्हा गोविंदने तिला सांगितले की आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी आणि राज कुशवाह या 3 कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी गुन्हा कबूल केला आहे, तेव्हा सोनमने आपली नजर खाली केली. ती गोविंदच्या डोळ्यात पाहू शकली नाही. सोनमला लहानपणापासून पाहत आलो असल्याने मला जाणवले की तो हत्येत सामील आहे. संतप्त झालेल्या गोविंदने सोनमला झापड मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला रोखले.


उमा देवी यांनी माध्यमांना सांगितले की, गोविंद त्याच्या बहिणीच्या कृत्याबद्दल खूप खजिल आणि संतप्त आहे. त्याने सांगितले की सोनमला शिक्षा व्हावी यासाठी तो आमच्यासोबत आहे." गोविंद मंगळवारी इंदूरला पोहोचला आणि थेट त्यांच्या घरी आला. आम्ही गोविंदला माफ केले कारण त्याला कटाची माहिती नव्हती. आता आपण सर्व मिळून सोनम आणि इतर खुन्यांना शिक्षा मिळवून देऊ असे आश्वासन गोविंदने राजाच्या कुटुंबियांना दिले.


मेघालय पोलिसांच्या 'ऑपरेशन हनिमून'मधून उघड झाले की सोनमने 23 मे रोजी शिलाँगमधील सोहरा येथे राजाला मारण्याचा कट रचला होता. तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन मारेकऱ्यांसह तिने राजाला एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्याची हत्या केली. पोलिसांना 42 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच रक्ताने माखलेले जॅकेट आणि सोनमचा रेनकोट असे पुरावे सापडले. सोनमने 9 जून रोजी गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले होते.

Comments
Add Comment

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; ढगफुटी आणि पूरामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात २३

गुरुग्राममध्ये साकारणार भारतातील पहिले ‘डिस्नीलँड’

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने देशातील पहिले ‘डिस्नीलँड-शैली’चे थीम पार्क गुरुग्रामजवळ उभारण्याचा

अमरनाथ यात्रेत ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन

जम्मू :अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ४ दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.

CA Exam Result: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई-ठाण्याच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सीए अंतिम परीक्षेत मुंबईचा 'टॉपर' मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला! भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून खरेदी करणार KJ500 रडार

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक तयारीने आणि