इंदोर : सोनमच्या भावाने घेतली राजाच्या आईची भेट

बहिणीच्या कृत्याबद्दल मागितली माफी


इंदोर : इंदोरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशी हिचा भाऊ गोविंद याने आज, बुधवारी इंदोरला जाऊन मृत जावयाच्या कुटुंबियांची भेट घेतली. आपली बहिणच मारेकरी असून तिच्या कृत्याबद्दल गोविंदने माफी मागितली. तसेच सोनमला फाशी व्हावी यासाठी लढू असे देखील त्याने सांगितले.


गोविंदने दिवंगत राजाची आई उमा देवीं यांना सांगितले की तो गाझीपूर (उत्तर प्रदेश) मध्ये सोनमला फक्त 2 मिनिटे भेटू शकला कारण पोलिस त्यांना भेटू देत नव्हते. दरम्यान, गोविंदने त्याची बहीण सोनमला विचारले, "तू या हत्येत सहभागी आहेस का?" सुरुवातीला सोनमने ते नाकारले, पण जेव्हा गोविंदने तिला सांगितले की आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी आणि राज कुशवाह या 3 कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी गुन्हा कबूल केला आहे, तेव्हा सोनमने आपली नजर खाली केली. ती गोविंदच्या डोळ्यात पाहू शकली नाही. सोनमला लहानपणापासून पाहत आलो असल्याने मला जाणवले की तो हत्येत सामील आहे. संतप्त झालेल्या गोविंदने सोनमला झापड मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला रोखले.


उमा देवी यांनी माध्यमांना सांगितले की, गोविंद त्याच्या बहिणीच्या कृत्याबद्दल खूप खजिल आणि संतप्त आहे. त्याने सांगितले की सोनमला शिक्षा व्हावी यासाठी तो आमच्यासोबत आहे." गोविंद मंगळवारी इंदूरला पोहोचला आणि थेट त्यांच्या घरी आला. आम्ही गोविंदला माफ केले कारण त्याला कटाची माहिती नव्हती. आता आपण सर्व मिळून सोनम आणि इतर खुन्यांना शिक्षा मिळवून देऊ असे आश्वासन गोविंदने राजाच्या कुटुंबियांना दिले.


मेघालय पोलिसांच्या 'ऑपरेशन हनिमून'मधून उघड झाले की सोनमने 23 मे रोजी शिलाँगमधील सोहरा येथे राजाला मारण्याचा कट रचला होता. तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन मारेकऱ्यांसह तिने राजाला एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्याची हत्या केली. पोलिसांना 42 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच रक्ताने माखलेले जॅकेट आणि सोनमचा रेनकोट असे पुरावे सापडले. सोनमने 9 जून रोजी गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले होते.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत