रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आता तिकीट आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या २४ तास अगोदरच जाहीर होणार

मुंबई : मुंबईसह देशभरात रेल्वे अपघातांची संख्या वाढली आहे. यासह रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे भारतीय रेल्वे विभाग सातत्याने टीकेचा सामना करत आहे. अशातच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेकडे अधिक लक्ष देत काही बदल करण्याचं ठरवलं आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी भारतीय रेल्वे तिकीट बूकिंग नियमांमध्ये काही बदल करणार आहे. रेल्वे प्रवाशांची रिझर्व्हेशन यादी आता प्रवास सुरू होण्याच्या २४ तास आधी तयार केली जाईल. याचाच अर्थ वेटिंगवर असलेल्या (वेटलिस्टेड) प्रवाशांना आता २४ तास आधीच समजेल की त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही.


रेल्वेने याबाबतची माहिती देताना म्हटलं आहे की ज्या प्रवाशांचं तिकीट वेटिंगवर असेल त्यांना रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी माहिती दिली जाईल की त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही. याआधी रेल्वेची कन्फर्मेशन यादी (चार्ट) ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी जारी केली जात होती. त्यामुळे वेटलिस्टेड प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कारण तिकीटाच्या पुष्टीसाठी शेवटपर्यंत कोणतीही निश्चित माहिती मिळत नव्हती. मात्र,त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असे.आता रेल्वे प्रवाशांची चिंता दूर करण्यासाठी प्रशासनाने मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे.



रेल्वे अधिकाऱ्यांनाही होणार फायदा


रेल्वे प्रशासन करत असलेल्या या बदलामुळे अधिकाऱ्यांना, स्टेशन मास्तरांना, रेल्वेंचं नियोजन करणाऱ्यांना अधिक चांगलं प्लॅनिंग करण्यास मदत मिळेल. किती प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट आहे, किती प्रवासी वेटलिस्टेड आहेत यासह बरीच माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडे २४ तास आधीच उपलब्ध असेल. प्रवाशांची संख्या पाहून रेल्वे प्रशासन इंजिनाला अधिक डबे जोडू शकतं किंवा कमी करू शकतं, प्रवाशांसाठी पुरेशी आसनव्यवस्था करू शकतं. तसेच फलाटांवरील व्यवस्थेकडे लक्ष देऊ शकतं.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने विद्यमान तिकीट प्रणालीत, तिकीट नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तत्काळ तिकीट बूकिंग व इतर सर्व आरक्षण प्रक्रिया जैसे थे स्थितीत सुरू राहतील. रेल्वेने केवळ एकच बदल केला आहे. केवळ फायनल रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याची वेळ बदलली आहे. हा चार्ट पूर्वी ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी तयार केला जात होता जो आता २४ तास आधी तयार केला जाईल. ज्यामुळे प्रवाशांना अधिक फ्लेक्सिबिलीटी व पर्याय मिळतील.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील