Rajasthan Accident : साथ जन्माची गाठ अधुरी! भीषण अपघातात वधू-वरासह ५ जण जागीच ठार

जयपूर : राजस्थानच्या जयपूर येथे आज, बुधवारी ट्रक आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. दौसा-मनोहरपूर मार्गावर भटकबास गावानजीक सकाळी ६.१५ वाजता झालेल्या या भीषण अपघातात लग्न करून घरी परतणारे वर-वधू देखील मृत्यूमुखी पडलेत.



पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. जीपमधील लोक लग्न समारंभाला उपस्थित राहून मध्यप्रदेशहून परतत होते. स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले.जखमींना निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात रायसर पोलिस स्टेशनचे प्रभारी रघुवीर म्हणाले रीस अपघातानंतर महामार्गावर जाम झाला आणि गोंधळ उडाला. वऱ्हाडींची जीप मध्यप्रदेशहून मनोहरपूरला जात होती. जखमींचे जबाब घेतले जात आहेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली जात आहे. काही गंभीर जखमींना एनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर

कर्नाटकापाठोपाठ आंध्रातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय