मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी, पुढील ४८ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार पुढील ४८ तास हवामान बदलतंय आहेत.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ९ आणि १० जून रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये इलका ते मध्यम पावसासह वादळी बारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे १३ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी कोकणातल्या रत्नागिरीत रात्रीपासूनच गुसळधार पाऊस सुरू असून, विजांच्या कडकडाटात पावसाने धुवांधार बंटिंग केली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून, रस्तेही जलमय झाले आहेत. मात्र, या पावसामुळे भात शेती करणाऱ्या शेतक-यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला आहे. पेरणी झालेल्या कोवळ्या भात रोपांना या पावसाचे मोठे आधार मिळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.