पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढरीत गर्दी करतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी ड्रोन, एआयचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून दीड कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. आषाढी वारीला कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणातून लाखो वारकरी पायी येतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञान आणि ड्रोनचा वापर पोलीस करणार आहेत.

दर तीन ते चार किलोमीटर अंतरावर वारकर्‍यांच्यासाठी विसावा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या विसाव्याच्या ठिकाणी बेड, पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार अशा सुविधा पुरवल्या जातील. वारीमार्गातील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याने मुरुमीकरण सुरू आहे.

आषाढी वारीनिमित्त चंद्रभागेत स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. सध्या पंढरपूर येथील नदीत पाणी उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार १८ जून २०२५ रोजी उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. ते पाणी २५ जून २०२५ पर्यंत चंद्रभागा नदीत पोहोचेल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह