पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढरीत गर्दी करतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी ड्रोन, एआयचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून दीड कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. आषाढी वारीला कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणातून लाखो वारकरी पायी येतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञान आणि ड्रोनचा वापर पोलीस करणार आहेत.

दर तीन ते चार किलोमीटर अंतरावर वारकर्‍यांच्यासाठी विसावा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या विसाव्याच्या ठिकाणी बेड, पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार अशा सुविधा पुरवल्या जातील. वारीमार्गातील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याने मुरुमीकरण सुरू आहे.

आषाढी वारीनिमित्त चंद्रभागेत स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. सध्या पंढरपूर येथील नदीत पाणी उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार १८ जून २०२५ रोजी उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. ते पाणी २५ जून २०२५ पर्यंत चंद्रभागा नदीत पोहोचेल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये