दर तीन ते चार किलोमीटर अंतरावर वारकर्यांच्यासाठी विसावा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या विसाव्याच्या ठिकाणी बेड, पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार अशा सुविधा पुरवल्या जातील. वारीमार्गातील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याने मुरुमीकरण सुरू आहे.
आषाढी वारीनिमित्त चंद्रभागेत स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. सध्या पंढरपूर येथील नदीत पाणी उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार १८ जून २०२५ रोजी उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. ते पाणी २५ जून २०२५ पर्यंत चंद्रभागा नदीत पोहोचेल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.