पर्यावरण संवर्धनासाठी सुहासिनींचा वटपौर्णिमेसाठी अभिनव संकल्प

वडाच्या झाडाचे प्रतीकात्मक चित्र रेखाटून पूजन


ठाणे :वटपौर्णिमेच्या निमित्ताने पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणाऱ्या सुहासिनींनी यंदा पर्यावरण रक्षणाचा मंत्र हृदयात बाळगून एक अभिनव संकल्प केला आहे. दरवर्षी वडाच्या फांद्या कापून पूजा करण्याऐवजी, यंदा त्या वडाच्या झाडाचे प्रतिकात्मक चित्र रेखाटून पूजन करणार आहेत.



या उपक्रमामुळे झाडांच्या फांद्या तोडण्याची गरजच उरणार नाही. परिणामी, वड वृक्षाचं रक्षण होणार असून, पर्यावरणसंवर्धनात महिलांचा ‘खारीचा वाटा’ अधिक ठळकपणे समोर येणार आहे.
शहरीकरणाच्या वाढत्या लाटेत ठाणे शहरात वड, पिंपळ आणि उंबर यासारखी स्थानिक झाडं जवळजवळ अदृश्य होऊ लागली आहेत. परिणामी, महिलांना वटपौर्णिमेला पूजनासाठी झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात, ज्यामुळे झाडांना इजा पोहचते.


या पार्श्वभूमीवर, यंदा अनेक महिलांनी पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्धार केला आहे. काहींनी प्रतिकात्मक वडाच्या झाडाचं चित्र रेखाटण्याचा, तर काहींनी रंगवलेले पोस्टर तयार करून पूजन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या उपक्रमामागे पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिकांचा सक्रिय सहभाग असून, श्रद्धा जपणारा हा उपक्रम भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन