मांजरीला पकडण्यासाठी बिबट्याची घरावर उडी; घराची भिंत पडली!

  65

नाशिक : बिबट्याच्या पाठलागाने घाबरून घरावर चढलेल्या मांजरीला पकडण्यासाठी बिबट्याने थेट घरावर उडी घेतली आणि या घटनेत घराची भिंत पडली. ही थरारक घटना देवळाली गावातील रोकडोबावाडी मागील भागात असलेल्या बुवा मळ्यात काल संध्याकाळी घडली.


नाशिक रोड जवळील आर्टिलरी सेंटरच्या कुंपणालगत असलेल्या या भागात गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने मळ्यातील लोकवस्ती भागातून एक मांजर उचलून नेली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा मांजरीच्या मागे लागला. जीव वाचवण्यासाठी ती मांजर भीमानाथ विश्वनाथ बुवा यांच्या पत्र्याच्या घरावर चढली.



मागे लागलेला बिबट्या थेट घरावर उडी मारून गेला. वजनदार बिबट्याच्या उडीमुळे घराची भिंत कोसळली आणि पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील निवृत्ती बुवा, कैलास बुवा, गुड्डू बुवा आणि विश्वनाथ बुवा यांनी धाव घेतली. मानवी हालचाल पाहून बिबट्याने पुन्हा जंगलात धूम ठोकली.


बुवा मळा या भागातून मागील वर्षी जवळपास सात ते आठ बिबटे वन विभागाने जेरबंद केले होते. पुन्हा या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी, रहिवासी व त्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

Comments
Add Comment

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र