Health: वयाच्या तिशीनंतर महिलांनी खायला हवेत हे ५ ड्रायफ्रुट्स

  116

मुंबई: वयाच्या तिशीनंतर महिलांना अधिक पोषकतत्वांची गरज असते कारण या वयानंतर त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात तसेच मेटाबॉलिज्मही कमी होते. दरम्यान, संतुलित आहाराच्या मदतीने त्या याची कमतरता भरून काढू शकतात. याच कारणामुळे अधिकतर तज्ञ महिलांना डाएटमध्ये ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात.


ड्रायफ्रुट्समध्ये अनेक पोषकतत्वे असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात. इम्युनिटी बूस्ट होते. शरीरामध्ये एनर्जी राहते. तसेच त्वचाही तुकतुकीत होते. जाणून घेऊया त्या ५ ड्रायफ्रुट्सबद्दल ज्या प्रत्येक महिलेने खाल्ल्या पाहिजेत.


मनुका


वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आपल्या डाएटमध्ये मनुका जरूर खाल्ल्या पाहिजेत. यात अँटीऑक्सिडंट, आर्यन आणि व्हिटामिन बी मोठ्या प्रमाणात असतात यामुळे रक्त संचलन योग्य पद्धतीने होते.


अंजीर


अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. इतकंच नव्हे तर एस्ट्रोजन लेव्हल नैसर्गिकरित्या बॅलन्स होतो.


खजूर


खजूर एनर्जी आणि आर्यनचा मोठा स्त्रोत आहे. महिलांसाठी खजूर अतिशय फायदेशीर आहे. ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी खजूर खावे. यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते यामुळे पचनास मदत होते.


बदाम


बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असते यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच हृदयाचे आजार दूर राहण्यास मदत होते. वयाच्या तिशीनंतर महिलांची हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांनीही दररोज भिजवलेले बदाम खावेत.


अक्रोड


वयाच्या तिशीनंतर महिलांनी अक्रोडचा आपल्या डाएटमध्ये समावेश जरूर करावा. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते तसेच व्हिटामिन ई असते. हे त्वचा आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ