Health: वयाच्या तिशीनंतर महिलांनी खायला हवेत हे ५ ड्रायफ्रुट्स

  111

मुंबई: वयाच्या तिशीनंतर महिलांना अधिक पोषकतत्वांची गरज असते कारण या वयानंतर त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात तसेच मेटाबॉलिज्मही कमी होते. दरम्यान, संतुलित आहाराच्या मदतीने त्या याची कमतरता भरून काढू शकतात. याच कारणामुळे अधिकतर तज्ञ महिलांना डाएटमध्ये ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात.


ड्रायफ्रुट्समध्ये अनेक पोषकतत्वे असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात. इम्युनिटी बूस्ट होते. शरीरामध्ये एनर्जी राहते. तसेच त्वचाही तुकतुकीत होते. जाणून घेऊया त्या ५ ड्रायफ्रुट्सबद्दल ज्या प्रत्येक महिलेने खाल्ल्या पाहिजेत.


मनुका


वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आपल्या डाएटमध्ये मनुका जरूर खाल्ल्या पाहिजेत. यात अँटीऑक्सिडंट, आर्यन आणि व्हिटामिन बी मोठ्या प्रमाणात असतात यामुळे रक्त संचलन योग्य पद्धतीने होते.


अंजीर


अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. इतकंच नव्हे तर एस्ट्रोजन लेव्हल नैसर्गिकरित्या बॅलन्स होतो.


खजूर


खजूर एनर्जी आणि आर्यनचा मोठा स्त्रोत आहे. महिलांसाठी खजूर अतिशय फायदेशीर आहे. ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी खजूर खावे. यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते यामुळे पचनास मदत होते.


बदाम


बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असते यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच हृदयाचे आजार दूर राहण्यास मदत होते. वयाच्या तिशीनंतर महिलांची हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांनीही दररोज भिजवलेले बदाम खावेत.


अक्रोड


वयाच्या तिशीनंतर महिलांनी अक्रोडचा आपल्या डाएटमध्ये समावेश जरूर करावा. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते तसेच व्हिटामिन ई असते. हे त्वचा आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत