केरळात कोरोना पाठोपाठ आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच आता केरळमध्ये हेपेटायटीस या प्राणघातक प्रादुर्भावामुळे चिंता वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम त्रिशूर जिल्ह्यात दिसून येत आहे, तिथे हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाने याबाबत लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.


त्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानंतर प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत लोकांना सूचना दिल्या आहेत. फक्त उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी पिण्यास सांगितले आहे. शिळे अन्न खाणे टाळा. विशेषतः हॉटेल्स आणि ढाब्यांना स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स आणि ढाब्यांना पिण्याचे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतरच द्यावे आणि गरम पाण्यात थंड पाणी मिसळू नये असे सांगण्यात आले आहे.



केरळमध्ये या संसर्गामागील मुख्य कारण हेपेटायटीस ए आणि ई विषाणू आहे, जो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. पावसाळा सुरू होणार आहे आणि या काळात रोग पसरण्याचा धोका आणखी वाढतो. हेपेटायटीसचा संसर्ग शरीरात प्रवेश केल्यानंतर, त्याची लक्षणे दिसण्यास १५ ते ६० दिवस लागू शकतात.ताप आणि शरीरदुखी, थकवा आणि अशक्तपणा, डोकेदुखी आणि मळमळ, डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, लघवी काळी पडणे. अतिसार जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःहून औषधे घेणे टाळा.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे