केरळात कोरोना पाठोपाठ आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ

  54

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच आता केरळमध्ये हेपेटायटीस या प्राणघातक प्रादुर्भावामुळे चिंता वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम त्रिशूर जिल्ह्यात दिसून येत आहे, तिथे हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाने याबाबत लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.


त्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानंतर प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत लोकांना सूचना दिल्या आहेत. फक्त उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी पिण्यास सांगितले आहे. शिळे अन्न खाणे टाळा. विशेषतः हॉटेल्स आणि ढाब्यांना स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स आणि ढाब्यांना पिण्याचे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतरच द्यावे आणि गरम पाण्यात थंड पाणी मिसळू नये असे सांगण्यात आले आहे.



केरळमध्ये या संसर्गामागील मुख्य कारण हेपेटायटीस ए आणि ई विषाणू आहे, जो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. पावसाळा सुरू होणार आहे आणि या काळात रोग पसरण्याचा धोका आणखी वाढतो. हेपेटायटीसचा संसर्ग शरीरात प्रवेश केल्यानंतर, त्याची लक्षणे दिसण्यास १५ ते ६० दिवस लागू शकतात.ताप आणि शरीरदुखी, थकवा आणि अशक्तपणा, डोकेदुखी आणि मळमळ, डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, लघवी काळी पडणे. अतिसार जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःहून औषधे घेणे टाळा.

Comments
Add Comment

Rajasthan Accident : साथ जन्माची गाठ अधुरी! भीषण अपघातात वधू-वरासह ५ जण जागीच ठार

जयपूर : राजस्थानच्या जयपूर येथे आज, बुधवारी ट्रक आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला

खासदार असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट का टाळली ?

नवी दिल्ली : पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईनंतर भारताने ऑपेशन सिंदूर राबवले.

शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण पुन्हा पुढे ढकलले, Axiom-4मिशन लाँचिंगची तारीख लवकरच होणार जाहीर

नवी दिल्ली: भारताच्या हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे

“आगळीक केल्यास पाकिस्तानात घुसून मारू”- एस. जयशंकर

नवी दिल्ली : पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची आगळीक केल्यास आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू असा इशारा

Rajasthan: पिकनिकसाठी गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये पिकनिकसाठी आलेले ११ तरुण बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले असताना वाहून

ChatGPT Down : चॅटजीपीटी डाऊन, कॉपी पेस्ट करणाऱ्या लोकांची उडाली झोप!

चॅटजीपीटी (Chat Gpt) हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. लोकांनी त्याची क्षमता आजमावली आणि आता लोकांची क्रेझ