Team India : भारतीय संघाच्या वेळापत्रकात बीसीसीआयने केला मोठा फेरबदल

मुंबई: भारतीय संघ या वर्षी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानप करत आहे. याच्या वेळापत्रकात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही फेरबदल केले आहेत. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद करणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सामना १० ऑक्टोबरला कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्समध्ये होणरा होता मात्र नव्या वेळापत्रकानुसार हा सामना नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल. त्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरला नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता मात्र आता हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर शिफ्ट करण्यात आला आहे. बाकीच्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा


पहिली कसोटी - २ ते ६ ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरी कसोटी - १० ते १४ ऑक्टोबर, नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा


पहिली कसोटी - १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता
दुसरी कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, गुवाहाटी
पहिली वनडे - ३० नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे - ३ डिसेंबर, रायपूर
तिसरी वनडे - ६ डिसेंबर, विशाखापट्टणम
पहिला टी-२० - ९ डिसेंबर , कटक
दुसरा टी-२० - ११ डिसेंबर, मुल्लांपूर
तिसरा टी-२० - १४ डिसेंबर, धरमशाला
चौथा टी-२० - १७ डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी-२० - १९ डिसेंबर, अहमदाबाद
Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य