Team India : भारतीय संघाच्या वेळापत्रकात बीसीसीआयने केला मोठा फेरबदल

  73

मुंबई: भारतीय संघ या वर्षी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानप करत आहे. याच्या वेळापत्रकात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही फेरबदल केले आहेत. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद करणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सामना १० ऑक्टोबरला कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्समध्ये होणरा होता मात्र नव्या वेळापत्रकानुसार हा सामना नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल. त्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरला नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता मात्र आता हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर शिफ्ट करण्यात आला आहे. बाकीच्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा


पहिली कसोटी - २ ते ६ ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरी कसोटी - १० ते १४ ऑक्टोबर, नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा


पहिली कसोटी - १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता
दुसरी कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, गुवाहाटी
पहिली वनडे - ३० नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे - ३ डिसेंबर, रायपूर
तिसरी वनडे - ६ डिसेंबर, विशाखापट्टणम
पहिला टी-२० - ९ डिसेंबर , कटक
दुसरा टी-२० - ११ डिसेंबर, मुल्लांपूर
तिसरा टी-२० - १४ डिसेंबर, धरमशाला
चौथा टी-२० - १७ डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी-२० - १९ डिसेंबर, अहमदाबाद
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल