Indore Missing Couple चा अखेर खुलासा झालाच! 'या' कारणामुळे सोनमनेच दिली होती पती राजाला मारण्याची सुपारी

शिलाँग: मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले इंदूरचे दाम्पत्य बेपत्ता झाल्याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहे.  पत्नी सोनम हिनेच पती राजा रघुवंशीला मारण्याची सुपारी मध्य प्रदेशातील तिघा जणांना दिली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा याचा देखील समावेश होता, या सर्व आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि भाड्याने घेतलेल्या मारेकऱ्यांसह तिच्या पती राजाला मारण्याचे कंत्राट दिले होते. सोनमचे लग्नापूर्वी राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते आणि तोच या हत्येचा सूत्रधार आहे.



लग्नापूर्वी सोनमचे राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध


लग्नापूर्वी सोनमचे राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते आणि तोच या हत्येचा सूत्रधार आहे. प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले की सोनमच्या वडिलांचा इंदूरमध्ये एक छोटा प्लायवूड कारखाना आहे, जिथे राज कुशवाहा काम करत होता. सोनम अनेकदा कारखान्याच्या ऑफिसमध्ये येत असे आणि इथेच दोघांमध्ये प्रेम झाले. राज कुशवाहा सोनमपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रेमसंबंधामुळे सोनमने राजसोबत मिळून राजाला मारण्याचा कट रचला.



जाणून घ्या पूर्ण घटनाक्रम


इंदूरचा रहवासी राजा रघुवंशी हा वाहतूक व्यावसायिक होता, ज्याचे सोनम सोबत ११ मे रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. लग्नाच्या नऊ दिवसांनी, २० मे रोजी, हे जोडपे हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले. २२ मे रोजी ते भाड्याने घेतलेल्या स्कूटरवरून मावलाखियात गावात पोहोचले आणि नोंगरियात गावातील 'लिव्हिंग रूट्स' पूल पाहण्यास गेले.  त्यानंतर या जोडप्याने नोंगरियातमधील शिप्रा होमस्टे येथे रात्र घालवली आणि २३ मे रोजी सकाळी चेक आउट केले. त्यानंतर मात्र दोघेही बेपत्ता झाले. दिनांक २४ मे रोजी शिलाँग-सोहरा रस्त्यावरील सोहरारीम येथील एका कॅफेबाहेर त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर सोडून दिलेली आढळली. त्यानंतर दि. २ जून रोजी राजाचा कुजलेला मृतदेह वेइसावडोंग धबधब्याजवळील खोल खड्ड्यात आढळला.  त्यानंतर सोनमचा मात्र काहीच पत्ता पोलिसांना लागत नव्हता. मात्र, आज ९ जून रोजी सोनम गाजीपूरमध्ये आढळली. आणि त्यानंतर या प्रकरणाचा पुरता खुलासा झाला.  

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत