भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी
नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या तातडीच्या आणि समन्वित बचाव मोहिमेमुळे मोठा जीवितहानीचा धोका टळला आहे. सिंगापूरच्या 'MV Wan Hai 503' या मालवाहू जहाजावर कंटेनरमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली होती. या संकटग्रस्त जहाजावरील २२ खलाशांपैकी १८ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर ४ जणांबाबत शोधकार्य सुरू आहे.
ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता माहिती व्यवस्थापन केंद्राला (IFC-IOR) समजली. त्यानंतर तात्काळ INS Surat आणि एक डॉर्नियर विमान घटनास्थळी पाठवण्यात आले. दुपारी ४:३० वाजेपर्यंत १८ खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले.
https://www.facebook.com/share/r/1BjnHcpZka/
आगीत जखमी झालेल्या खलाशांना तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, जहाज सध्या नवीन मंगळुरू बंदराकडे रवाना झाले आहे. तेथे पुढील उपचार आणि खलाशांची उतरवणूक केली जाणार आहे.
भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग आणि इतर एजन्सींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एक मोठी समुद्रातील दुर्घटना टळली.