'एमव्ही वान हाय' वरील १८ खलाशांना आयएनएस सुरतने वाचवले!

भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी


नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या तातडीच्या आणि समन्वित बचाव मोहिमेमुळे मोठा जीवितहानीचा धोका टळला आहे. सिंगापूरच्या 'MV Wan Hai 503' या मालवाहू जहाजावर कंटेनरमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली होती. या संकटग्रस्त जहाजावरील २२ खलाशांपैकी १८ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर ४ जणांबाबत शोधकार्य सुरू आहे.


ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता माहिती व्यवस्थापन केंद्राला (IFC-IOR) समजली. त्यानंतर तात्काळ INS Surat आणि एक डॉर्नियर विमान घटनास्थळी पाठवण्यात आले. दुपारी ४:३० वाजेपर्यंत १८ खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले.


https://www.facebook.com/share/r/1BjnHcpZka/

आगीत जखमी झालेल्या खलाशांना तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, जहाज सध्या नवीन मंगळुरू बंदराकडे रवाना झाले आहे. तेथे पुढील उपचार आणि खलाशांची उतरवणूक केली जाणार आहे.


भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग आणि इतर एजन्सींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एक मोठी समुद्रातील दुर्घटना टळली.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या