'म्हाडा, सिडको लॅाटरीत डबेवाल्यांना ५ टक्के आरक्षण द्या'

मुंबई :'म्हाडाच्या आणि सिडको यांच्यावतीने जी नविन घरे बांधण्यात येतील त्यामध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगार यांना द्यावे. यामुळे डबेवाला कामगाराला आपण काम करतो त्या रेल्वे लाईनवर त्याला घर मिळेल ते त्याच्या सोईचे असेल. ज्या प्रमाणे गिरणी कामगाराला सरकारने मदत करून मुंबईत १० लाखात घर दिले आहे. त्याच धर्तीवर मुंबई डबेवाला कामगार यांना मुंबईत १० लाखात घर द्यावे', अशी मुंबई डबेवाला कामगार संघटनेची मागणी आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की महाराष्ट्र शासनाच्यावतीने डबेवाला कामगार यांना दिवे अंजूर ता.भिवंडी येथे घरे उपलब्द करून दिली जातील. दिवे अंजूर ता.भिवंडी येथील घरे डबेवाला कामगार यांना गैरसोईची असणार आहेत आणि त्या घरांची किंमत २५ लाख रूपये ठेवली आहे. ती किंमत डबेवाला कामगाराला न परवडणारी आहे. डबेवाला कामगार हा प्रामुख्याने एमएमआरडीएच्या परिक्षेत्रात रहातो.


जर महाराष्ट्र शासनाने डबेवाला कामगाराला दिवे अंजूर ता. भिवंडी येथे घर उपलब्ध करून दिले तर विरार, बोरीवली, अंधेरी येथील डबेवाला कामगार याला ते गैरसोईचे होणार आहे, आणि विरार येथे महाराष्ट्र शासनाने घर उपलब्ध करून दिले तर ठाणे, डोंबिवली, घाटकोपर येथील डबेवाला कामगारांना ते गैरसोईचे होणार आहे. त्यापेक्षा सरकारला आमची विनंती आहे. म्हाडाच्यावतीने जेथे नव्याने घरे बांधली जातील. त्यामध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगारांना द्यावे. अशी मागणी डबेवाला कामगार संघटनेनेकेली आहे.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.