'म्हाडा, सिडको लॅाटरीत डबेवाल्यांना ५ टक्के आरक्षण द्या'

  47

मुंबई :'म्हाडाच्या आणि सिडको यांच्यावतीने जी नविन घरे बांधण्यात येतील त्यामध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगार यांना द्यावे. यामुळे डबेवाला कामगाराला आपण काम करतो त्या रेल्वे लाईनवर त्याला घर मिळेल ते त्याच्या सोईचे असेल. ज्या प्रमाणे गिरणी कामगाराला सरकारने मदत करून मुंबईत १० लाखात घर दिले आहे. त्याच धर्तीवर मुंबई डबेवाला कामगार यांना मुंबईत १० लाखात घर द्यावे', अशी मुंबई डबेवाला कामगार संघटनेची मागणी आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की महाराष्ट्र शासनाच्यावतीने डबेवाला कामगार यांना दिवे अंजूर ता.भिवंडी येथे घरे उपलब्द करून दिली जातील. दिवे अंजूर ता.भिवंडी येथील घरे डबेवाला कामगार यांना गैरसोईची असणार आहेत आणि त्या घरांची किंमत २५ लाख रूपये ठेवली आहे. ती किंमत डबेवाला कामगाराला न परवडणारी आहे. डबेवाला कामगार हा प्रामुख्याने एमएमआरडीएच्या परिक्षेत्रात रहातो.


जर महाराष्ट्र शासनाने डबेवाला कामगाराला दिवे अंजूर ता. भिवंडी येथे घर उपलब्ध करून दिले तर विरार, बोरीवली, अंधेरी येथील डबेवाला कामगार याला ते गैरसोईचे होणार आहे, आणि विरार येथे महाराष्ट्र शासनाने घर उपलब्ध करून दिले तर ठाणे, डोंबिवली, घाटकोपर येथील डबेवाला कामगारांना ते गैरसोईचे होणार आहे. त्यापेक्षा सरकारला आमची विनंती आहे. म्हाडाच्यावतीने जेथे नव्याने घरे बांधली जातील. त्यामध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगारांना द्यावे. अशी मागणी डबेवाला कामगार संघटनेनेकेली आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता