Bob and HDFC Bank : पीएनबीसह बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेने केली कर्जदारात कपात 'या' टक्क्यांवर घसरले आहेत व्याजदर !

प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी रेपो दरात (Repo Rate ) दरात कपात केल्यानंतर आता त्याचा परिणाम बँकेच्या धोरणात्मक निर्णयांवर दिसून येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने आपल्या कर्जदरात (Lending Rate) ५० बेसिस पूर्णांकाने (50 Basis Points) कपात केली आहे. त्यामुळे आता बँक ऑफ बडोदाकडून कर्जावरील व्याजदरात कपात होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांना मासिक हप्ता (EMI) मध्ये कटोती होणार आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेने आपल्या मार्जिनल दर (Marginal Rates) मध्ये १० बेसिस पूर्णांकाने घट केल्याने त्याचा मोठा लाभ गृहकर्जधारक व इतर कर्जधारकांना मिळू शकतो.


याआधी पंजाब नॅशनल बँक (PNB) ने देखील ५० बेसिस पूर्णांकाने आपल्या कर्जदरात ५० बेसिस पूर्णांकाने घट केली होती. एचडीएफसीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जून ७ पासून एमसीएलआर (MCLR) चे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे व्याजदर ढोबळमानाने ८.९० टक्क्यावर पोहोचले आहेत. दोन वर्ष व त्यापुढील वर्षासाठी ९.१० टक्क्यांवर व्याजदर पोहोचू शकतो.


यापूर्वी आरबीआयने अपेक्षित २५ बेसिस पूर्णांकाने रेपो दरात कपात न करता ०.५० टक्क्याने कमी केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात तरलता (Liquidity) वाढू शकते. त्यातूनच चलन पुरवठ्यात वाढ झाल्याने कर्जाबरोबरच अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आरबीआयच्या सहा सदस्यीय समितीने बहुमताने दरात कपात करण्याचा रक्कम घेतला. त्यामुळे आता ६ टक्क्यांवरून रेपो दरात ५.५० टक्क्यांवर घट झाली आहे.


तसेच कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये १०० बेसिस पूर्णांकाने कपात करून तो ३ टक्क्यांपर्यंत कमी केला ज्यामुळे आता बँकिंग व्यवस्थेत आधीच असलेल्या अतिरिक्त तरलतेत २.५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी