सप्तकुंडमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा कहर; २०० हून अधिक जखमी!

छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध अंजिठा लेण्यांजवळील सप्तकुंड धबधबा बघायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. बकरी ईदची सुट्टी आणि शनिवार-रविवारचा योग साधून मोठ्या संख्येने पर्यटक येथे जमले होते. पण दुपारी अचानक मधमाशांच्या थव्याने गर्दीवर हल्ला केल्याने एकच अफरातफरी माजली.


या हल्ल्यात तब्बल २०० हून अधिक पर्यटक जखमी झाले असून, अनेकांना तातडीने वैद्यकीय मदत द्यावी लागली. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मधमाशांच्या हल्ल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.


पर्यटनस्थळ असूनही सुरक्षेच्या बाबतीत पुरेशा उपाययोजना न केल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता होत आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना