जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहाराविषयी जनजागृती

ठाणे : ‘व्यायाम हे शरीरासाठी ज्ञान असेल, तर सकस आहार हे चांगले संस्कार आहेत,’ या विचारातून ठाण्यातील वि.सा. सामान्य रुग्णालय येथे ‘आहाराचे आरोग्य’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. LHV प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या "Nutrition Lab" च्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.


जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अळीवाची खीर, नाचणीची चकली, बाजरीचे अप्पे, पौष्टिक ढोकळा, मेथीचे बिना साखरेचे लाडू अशा पारंपरिक व पौष्टिक पदार्थांचं सादरीकरण करण्यात आलं. आहारात विविध घटकांचा समावेश कसा करावा, हे तंतोतंत समजावण्यात आलं. पदार्थांची माहिती देतानाच त्यांचे आरोग्यावर होणारे परिणामही स्पष्ट करण्यात आले.


या उपक्रमाला अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धिरज महंगाडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहूड, शुश्रुषा महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती श्रद्धा मेस्त्री व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं. यावेळी डॉ. संगीता माकोडे, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. कल्पना माले व अधिसेविका श्रीमती मंजुळा घाणे यांनी पदार्थांची प्रत्यक्ष चव घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पाककला आणि त्यामागील कृती, पोषणमूल्ये, आणि आरोग्य दृष्टिकोन यावेळी स्पष्ट करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे आरोग्याचं भान वाढतं, जनजागृती होते आणि रुग्णांशी अधिक सकारात्मक संवाद घडतो,अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.


“सतत औषधांवर अवलंबून न राहता आहाराच्या माध्यमातूनही आरोग्य सुधारता येतं. फक्त त्यासाठी आहाराची योग्य माहिती, योग्य निवड आणि थोडा प्रामाणिक प्रयत्न हवा.”असे डॉ. कैलास पवारयांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला

कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकता ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा

ये पब्लिक है, सब जानती है!

केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर कल्याण  : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो,

ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी