जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहाराविषयी जनजागृती

ठाणे : ‘व्यायाम हे शरीरासाठी ज्ञान असेल, तर सकस आहार हे चांगले संस्कार आहेत,’ या विचारातून ठाण्यातील वि.सा. सामान्य रुग्णालय येथे ‘आहाराचे आरोग्य’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. LHV प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या "Nutrition Lab" च्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.


जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अळीवाची खीर, नाचणीची चकली, बाजरीचे अप्पे, पौष्टिक ढोकळा, मेथीचे बिना साखरेचे लाडू अशा पारंपरिक व पौष्टिक पदार्थांचं सादरीकरण करण्यात आलं. आहारात विविध घटकांचा समावेश कसा करावा, हे तंतोतंत समजावण्यात आलं. पदार्थांची माहिती देतानाच त्यांचे आरोग्यावर होणारे परिणामही स्पष्ट करण्यात आले.


या उपक्रमाला अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धिरज महंगाडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहूड, शुश्रुषा महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती श्रद्धा मेस्त्री व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं. यावेळी डॉ. संगीता माकोडे, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. कल्पना माले व अधिसेविका श्रीमती मंजुळा घाणे यांनी पदार्थांची प्रत्यक्ष चव घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पाककला आणि त्यामागील कृती, पोषणमूल्ये, आणि आरोग्य दृष्टिकोन यावेळी स्पष्ट करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे आरोग्याचं भान वाढतं, जनजागृती होते आणि रुग्णांशी अधिक सकारात्मक संवाद घडतो,अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.


“सतत औषधांवर अवलंबून न राहता आहाराच्या माध्यमातूनही आरोग्य सुधारता येतं. फक्त त्यासाठी आहाराची योग्य माहिती, योग्य निवड आणि थोडा प्रामाणिक प्रयत्न हवा.”असे डॉ. कैलास पवारयांनी सांगितले.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र