जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहाराविषयी जनजागृती

ठाणे : ‘व्यायाम हे शरीरासाठी ज्ञान असेल, तर सकस आहार हे चांगले संस्कार आहेत,’ या विचारातून ठाण्यातील वि.सा. सामान्य रुग्णालय येथे ‘आहाराचे आरोग्य’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. LHV प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या "Nutrition Lab" च्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.


जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अळीवाची खीर, नाचणीची चकली, बाजरीचे अप्पे, पौष्टिक ढोकळा, मेथीचे बिना साखरेचे लाडू अशा पारंपरिक व पौष्टिक पदार्थांचं सादरीकरण करण्यात आलं. आहारात विविध घटकांचा समावेश कसा करावा, हे तंतोतंत समजावण्यात आलं. पदार्थांची माहिती देतानाच त्यांचे आरोग्यावर होणारे परिणामही स्पष्ट करण्यात आले.


या उपक्रमाला अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धिरज महंगाडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहूड, शुश्रुषा महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती श्रद्धा मेस्त्री व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं. यावेळी डॉ. संगीता माकोडे, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. कल्पना माले व अधिसेविका श्रीमती मंजुळा घाणे यांनी पदार्थांची प्रत्यक्ष चव घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पाककला आणि त्यामागील कृती, पोषणमूल्ये, आणि आरोग्य दृष्टिकोन यावेळी स्पष्ट करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे आरोग्याचं भान वाढतं, जनजागृती होते आणि रुग्णांशी अधिक सकारात्मक संवाद घडतो,अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.


“सतत औषधांवर अवलंबून न राहता आहाराच्या माध्यमातूनही आरोग्य सुधारता येतं. फक्त त्यासाठी आहाराची योग्य माहिती, योग्य निवड आणि थोडा प्रामाणिक प्रयत्न हवा.”असे डॉ. कैलास पवारयांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील