वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेसाठी विशेष मानली जातात. त्यातील एक म्हणजे वट सावित्री व्रत श्रद्धा, प्रेम आणि निष्ठेचं प्रतिक. हे व्रत दरवर्षी दोनदा साजरं केलं जातं. एक ज्येष्ठ अमावस्येला आणि दुसरं ज्येष्ठ पौर्णिमेला. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि उत्तर भारतात हे व्रत मोठ्या श्रद्धेने साजरं केलं जातं.



२०२५ मध्ये वट पौर्णिमा कधी आहे?


वट पौर्णिमा २०२५ मध्ये १० जून रोजी साजरी केली जाईल. या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सकाळी ११:३५ वाजता सुरू होईल आणि ती ११ जून दुपारी १:१३ वाजता संपेल. त्यामुळे व्रत १० जून रोजी पार पाडलं जाईल. ११ जूनला स्नान, दान आणि पारंपरिक कर्मकांड केलं जाईल.



पूजेसाठी योग्य वेळ (मुहूर्त)


वट वृक्ष पूजेचा मुहूर्त: सकाळी ८:५२ ते दुपारी २:०५ पर्यंत


स्नान व दानासाठी मुहूर्त: ११ जून रोजी पहाटे ४:०२ ते ४:४२


चंद्रोदय: संध्याकाळी ६:४५ वाजता


या दिवशी महिलांनी उपवास ठेवून विधीवत वटवृक्षाची पूजा करावी आणि आपल्या पतीच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्याच्या कामनेसाठी प्रार्थना करावी.



वट सावित्री व्रताचं धार्मिक आणि पौराणिक महत्त्व


वट पौर्णिमा व्रताचं मूळ सावित्री-सत्यवानाच्या पुराणकथेत आहे. सत्यवान हा राजपुत्र जंगलात लाकूड तोडताना बेशुद्ध पडतो, त्यावेळी त्याची पत्नी सावित्री त्याला वडाच्या झाडाखाली झोपवते आणि त्याला वाचवण्यासाठी यमराजाशी संघर्ष करते. तिच्या निष्ठा, प्रेम आणि समर्पणामुळे यमराज सत्यवानाचा प्राण परत करतो. ही कथा स्त्रीशक्ती, समर्पण आणि श्रद्धेचं प्रतिक आहे. म्हणूनच या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून सात प्रदक्षिणा घालतात. पूजा करताना त्या बांबूच्या पंख्याने झाडाला आणि नंतर आपल्या पतीला वारा घालतात.



बांबूच्या पंख्याचं खास महत्त्व


पूजेनंतर महिलांनी आपल्या पतीचे पाय धुऊन त्यांना बांबूच्या पंख्याने वारा घालावा, ही परंपरा सावित्रीच्या कृतीचं प्रतीक मानली जाते. पतीसाठी त्याग, सेवा आणि प्रेम दाखवणारी ही कृती विवाहित जीवनातल्या नात्याला अधिक बळकटी देते. या दिवशी बांबूचा पंखा वडाच्या झाडाला अर्पण करणं, नंतर पतीला पंखा लावणं आणि शेवटी तो दान करणं, हे सर्व व्रताच्या पूर्तीचं एक पवित्र रूप मानलं जातं.



वट पौर्णिमा एक प्रेमाची, श्रद्धेची आणि नात्याची गाठ


वट पौर्णिमा केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती भारतीय स्त्रीच्या मानसिक शक्तीचा, नात्याच्या नाजूक पण मजबूत गाठीचा आणि भक्तीपूर्ण भावनेचा संगम आहे. या व्रतातील प्रत्येक कृती, उपवास, वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा, पतीसाठी प्रार्थना या सर्व गोष्टी एका आदर्श पतिव्रतेचं चित्र रेखाटतात.


१० जून २०२५ रोजी येणारी वट पौर्णिमा ही केवळ व्रत नव्हे, तर एका नात्याची जपणूक, एक परंपरेची आठवण आणि स्त्रीच्या श्रद्धेची अनुभूती आहे. या दिवशी नुसतं उपवास न करता, मनापासून भक्तीपूर्वक पूजा केल्यास त्या नात्यात प्रेम आणि समर्पण अधिक दृढ होतं.

Comments
Add Comment

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला

West Bengal : विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान; ममता बॅनर्जी -सुभेंदू अधिकारी आमने सामने

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.. या टप्प्यात राज्यातील १४२

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Preet Singh : मुंबईत 'या' अभिनेत्रीला जबर मारहाण; डोळे सुजले, दात पाडले

मुंबई : मुंबईत एका अभिनेत्रीला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या अभिनेत्रोचे डोळे सुजले तसेच दात पडले असून

Navi Mumbai Mahapalika : महापालिका शाळेतील मुलींना ‘गुड टच, बॅड टच‘ तसेच सेल्फ डिफेन्सचे शिक्षणं द्यावे

युवा सेनेचे जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : महापालिका शाळेतील मुलींना

Nashik : नाशिकमधील वृक्षतोडीला ‘हरित लवादा’ची तूर्तास स्थगिती, पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार

नाशिक : नाशिककरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे कारण शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने