राजिपच्या शाळांमध्ये शिक्षकांची एक हजारांहून अधिक पदे रिक्त

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार आबाळ


अलिबाग : रायगड जिल्ह्यात राजिपच्या शाळांमध्ये शिक्षकांची एक हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्याध्यापकांची ७५ टक्के पदे रिक्त असून, आठ तालुक्यांतील शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे एकही पद भरलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार आबाळ होणार असल्याने पालकवर्गात नाराजीचा सूर आहे. रायगड जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक असे मिळून ६ हजार २३१ पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात ५ हजार १५१२ पदे आजही रिक्त असल्याचे पाहायला मिळते आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्तपदांची टक्केवारी १७.३ इतकी आहे. मुख्याध्यापकांची १११ पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे भरलेली आहेत. महाड, माणगाव, म्हसळा, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, तळा या आठ तालुक्यांत एकही मुख्याध्यापक कार्यरत नाही. एकीकडे खासगी आणि इंग्रजी शाळांचे आक्रमण सुरू असताना दुसरीकडे सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारे आहे.



रायगड जिल्ह्यात नवीन इंग्रजी माध्यमांची संख्या दरवर्षी वाढते आहे. शहराबरोबरच गावा-गावांतील पालकांचा कल इंग्रजी मध्याम शाळांकडे वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला होता; पटसंख्या कमी झाल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत.


यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा विस्तार मोठा असल्याने विद्यार्थी गुणवत्तेच्या आनुषंगाने केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी जि. परिषद शाळांना भेटी देणे आवश्यक आहे.


प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे


पद                 मंजूर पदे     भरलेली पदे   रिक्त पदे
मुख्याध्यापक  १११             ३२                  ८३
उपशिक्षक      ५१८४         ४५२०             ७२१
पदवीधर         ९३६           ६६३                २७३




शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नवीन शिक्षण संच धोरण आणले आहे. या धोरणानुसार, प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने पुढील काही दिवसांत शिक्षकांची कमतरता भरून निघेल, अशी आशा आहे.
- पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)



Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग