रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातानंतर मिनी बस वीस फूट खोल दरीत कोसळली. बावनदी परिसरात ही दुर्घटना घडली. टँकरमधून गॅसची गळती झाली. टँकर धडकेनंतर जवळ असलेल्या गुरांच्या गोठ्याला जाऊन धडकला. गोठ्याजवळ असलेल्या एका घराला पण या अपघाताचा फटका बसला. दुर्घटनेत गुरांचा गोठा जळून खाक झाला. आग लागल्यामुळे दोन गुरे जखमी झाली. घराजवळ उभी असलेली रिक्षा जळून गेली. घरावरील फायबरचे पत्रे जळून गेले. अपघातात वीस ते पंचवीसजण जखमी झाले. जखमींना तातडीने रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, महसूल, अग्निशमन दल, स्थानिक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. सीएनजी टँकर मधून होणारी गळती थांबवण्यात आली आहे. अपघात झाला त्यावेळी घरात असलेली माणसं आवाज ऐकून घराबाहेर आली. यामुळे धडकेनंतर टँकर गोठ्याला आणि गोठ्याजवळच्या घराला आपटला तरी घरातील रहिवासी सुरक्षित आहेत.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

इस्रायलचा मोठ्या गॅस फिल्डवर हल्ला, खवळलेल्या इराणकडून आखाती देशांमधील तेल आणि वायू केंद्रांना लक्ष्य

तेहरान: मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून बुधवारी इस्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या 'साऊथ पार्स'

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

संजनाच्या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात सूरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज?

मुंबई: बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो.

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक