रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातानंतर मिनी बस वीस फूट खोल दरीत कोसळली. बावनदी परिसरात ही दुर्घटना घडली. टँकरमधून गॅसची गळती झाली. टँकर धडकेनंतर जवळ असलेल्या गुरांच्या गोठ्याला जाऊन धडकला. गोठ्याजवळ असलेल्या एका घराला पण या अपघाताचा फटका बसला. दुर्घटनेत गुरांचा गोठा जळून खाक झाला. आग लागल्यामुळे दोन गुरे जखमी झाली. घराजवळ उभी असलेली रिक्षा जळून गेली. घरावरील फायबरचे पत्रे जळून गेले. अपघातात वीस ते पंचवीसजण जखमी झाले. जखमींना तातडीने रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, महसूल, अग्निशमन दल, स्थानिक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. सीएनजी टँकर मधून होणारी गळती थांबवण्यात आली आहे. अपघात झाला त्यावेळी घरात असलेली माणसं आवाज ऐकून घराबाहेर आली. यामुळे धडकेनंतर टँकर गोठ्याला आणि गोठ्याजवळच्या घराला आपटला तरी घरातील रहिवासी सुरक्षित आहेत.
Comments
Add Comment

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर