लोणावळा : भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

  67

लोणावळा : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (८ जून) घडली. तरुणांचा ग्रुप धरणावर फिरायला गेला होता. यावेळी ही घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साहिल अश्रफ अली शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.दोन्हीही तरुण उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त लोणावळ्यात राहत होते.रविवारी(दि.८) सुट्टी असल्याने लोणावळ्यात राहणाऱ्या तरुणांचा ग्रुप भुशी डॅम परिसरात फिरायला गेला होता.


धरण परिसरात फिरत असताना त्यांना पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे सर्व मित्र धरणात उतरले.पाण्यात उतरल्यानंतर पोहत होते. दोघे बरेच आतमध्ये गेले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि बुडायला लागले. इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. पण, मदत मिळेपर्यंत दोघेही बुडाले होते.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा पोलीस, आपत्काली पथक आणि शिवदुर्ग टीम घटनास्थळी आली. त्यांनी पाण्यात शोध घेऊन दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या