बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

  50

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. आता १० लाख नाही तर २५ लाखांची मदत केली जाणार आहे.


याआधी राज्य सरकारने १० लाख रूपये मदत निधीची घोषणा केली होती मात्र घटनेचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्र्‍यांनी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ मदत केली जावी यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल.



११ लोकांचा गेला होता जीव


आरसीबीच्या संघाने १८ वर्षानंतर पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. यामुळे या विजयाचे सेलीब्रेशन कऱण्यासाठी स्टेडियममध्ये तुफान गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रेशनदरम्यान स्टेडियमबाहेर आणि आत अचानक गर्दीवरील नियंत्रण सुटले. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले होते.

Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या