बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. आता १० लाख नाही तर २५ लाखांची मदत केली जाणार आहे.


याआधी राज्य सरकारने १० लाख रूपये मदत निधीची घोषणा केली होती मात्र घटनेचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्र्‍यांनी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ मदत केली जावी यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल.



११ लोकांचा गेला होता जीव


आरसीबीच्या संघाने १८ वर्षानंतर पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. यामुळे या विजयाचे सेलीब्रेशन कऱण्यासाठी स्टेडियममध्ये तुफान गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रेशनदरम्यान स्टेडियमबाहेर आणि आत अचानक गर्दीवरील नियंत्रण सुटले. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले होते.

Comments
Add Comment

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार