बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. आता १० लाख नाही तर २५ लाखांची मदत केली जाणार आहे.


याआधी राज्य सरकारने १० लाख रूपये मदत निधीची घोषणा केली होती मात्र घटनेचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्र्‍यांनी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ मदत केली जावी यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल.



११ लोकांचा गेला होता जीव


आरसीबीच्या संघाने १८ वर्षानंतर पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. यामुळे या विजयाचे सेलीब्रेशन कऱण्यासाठी स्टेडियममध्ये तुफान गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रेशनदरम्यान स्टेडियमबाहेर आणि आत अचानक गर्दीवरील नियंत्रण सुटले. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले होते.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे