आता मुंबईत किनारा मार्गावर मिळणार थांबा

पालिकेकडून 'या' चार जागांची निवड


मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंतच्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सर्व टप्पे खुले करण्यात आले आहेत. या मार्गाला वाहनचालकांनीही पसंती दिली असून आता मुंबई महापालिका या मार्गावर बेस्ट बसला थांबे देणार आहे. त्या्साठी चार ठिकाणांची निवडही केली आहे. मरिन ड्राइव्हप्रमाणे सागरी किनारा मार्गावर विहारपथ, सीसीटीव्ही व अन्य सुरक्षा उपाययोजान केल्यानंतर बेस्ट बसगाड्यांना थांबे देण्यात येतील, असे मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.



मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत म्हणजेच नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गंत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्ीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत उभारण्यात आला आहे. १०.५८ किमी इतकी लांबी आहे. या मार्गावरून १२ मार्च २०२४ पासून आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सागरी किनारा मार्गावरून सुरू असतो. सध्या सकाळी ७ ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहन चालकांसाठी मार्ग खुला आहे.


सागरी किनारा मार्गावर बेस्ट बसबसगाड्यांनाही थांबा देण्यासाठी महापालिका विचार करत आहे. त्यासाठी चार जागांचीही निवड केली आहे. येथे बस थांबे बनवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या मार्गावर वरळी दिशेने जाताना बोगद्याबाहेर, ब्रिच कँडीजवळ, वरळी पूनम चेंबरमागील बाजू आणि वरळी डेअरी समोरच दोन्ही दिशेला बसथांबे करण्यासाठी या जागांची निवड करण्यात आल्याचे सांगितले.


महापालिकेकडून मरिन ड्राइव्हप्रमाणेच सध्या किनारा मार्गाला लागूनच फेरफटका मारण्यासाठी विहारपथ (प्रोमिनेड) केला जात आहे. हे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आता ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विहारपथाच्या कामाबरोबर सीसीटीव्ही बसवण्याची कामेही गतीने सुरू आहेत. या कामांसह सुरक्षेचे सर्व उपाय केल्यानंतरच बसथांबे देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. ज्या चार जागांची निवड केली आहे, तेथे सबवे असून बेस्ट बस मधून उतरताच या सबवेतून प्रवाशांना पूर्व-पश्चिम दिशेला निश्चित केलेल्या ठिकाणी जाता येणार आहे.


तसेच बेस्ट बस प्रवाशांना विहारपथावरही जाता येईल. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाशीही लवकरच बैठक घेतली जाणार आहे. तर बेस्ट उपक्रमानेही सागरी किनारा मार्ग सुरू होताच बेस्ट बस थांब्याबाबत चर्चा केली होती. सध्या मुंबई सागरी किनारा मार्गावरून बेस्टची ए ७८ क्रमांकाची एसी बस धावते. ही बस भायखळा रेल्वे स्थानक पश्चिम ते कुलाबा बस आगारापर्यंत धावते. सातरस्ता, महालक्ष्मी स्थानक, हाजी अली, ब्रीच कॅण्डी, भुलाभाई देसाई रोड, सागरी किनारा मार्ग, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट स्थानकाहून ही बस पुढे जाते. मात्र या बसला सागरी किनारा मार्गावर थांबा नाही. या बसच्या सोमवार ते शुक्रवार १९ फेऱ्या आणि रविवारी काही मोजक्याच फेऱ्या होतात.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य