आता मुंबईत किनारा मार्गावर मिळणार थांबा

पालिकेकडून 'या' चार जागांची निवड


मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंतच्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सर्व टप्पे खुले करण्यात आले आहेत. या मार्गाला वाहनचालकांनीही पसंती दिली असून आता मुंबई महापालिका या मार्गावर बेस्ट बसला थांबे देणार आहे. त्या्साठी चार ठिकाणांची निवडही केली आहे. मरिन ड्राइव्हप्रमाणे सागरी किनारा मार्गावर विहारपथ, सीसीटीव्ही व अन्य सुरक्षा उपाययोजान केल्यानंतर बेस्ट बसगाड्यांना थांबे देण्यात येतील, असे मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.



मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत म्हणजेच नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गंत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्ीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत उभारण्यात आला आहे. १०.५८ किमी इतकी लांबी आहे. या मार्गावरून १२ मार्च २०२४ पासून आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सागरी किनारा मार्गावरून सुरू असतो. सध्या सकाळी ७ ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहन चालकांसाठी मार्ग खुला आहे.


सागरी किनारा मार्गावर बेस्ट बसबसगाड्यांनाही थांबा देण्यासाठी महापालिका विचार करत आहे. त्यासाठी चार जागांचीही निवड केली आहे. येथे बस थांबे बनवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या मार्गावर वरळी दिशेने जाताना बोगद्याबाहेर, ब्रिच कँडीजवळ, वरळी पूनम चेंबरमागील बाजू आणि वरळी डेअरी समोरच दोन्ही दिशेला बसथांबे करण्यासाठी या जागांची निवड करण्यात आल्याचे सांगितले.


महापालिकेकडून मरिन ड्राइव्हप्रमाणेच सध्या किनारा मार्गाला लागूनच फेरफटका मारण्यासाठी विहारपथ (प्रोमिनेड) केला जात आहे. हे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आता ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विहारपथाच्या कामाबरोबर सीसीटीव्ही बसवण्याची कामेही गतीने सुरू आहेत. या कामांसह सुरक्षेचे सर्व उपाय केल्यानंतरच बसथांबे देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. ज्या चार जागांची निवड केली आहे, तेथे सबवे असून बेस्ट बस मधून उतरताच या सबवेतून प्रवाशांना पूर्व-पश्चिम दिशेला निश्चित केलेल्या ठिकाणी जाता येणार आहे.


तसेच बेस्ट बस प्रवाशांना विहारपथावरही जाता येईल. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाशीही लवकरच बैठक घेतली जाणार आहे. तर बेस्ट उपक्रमानेही सागरी किनारा मार्ग सुरू होताच बेस्ट बस थांब्याबाबत चर्चा केली होती. सध्या मुंबई सागरी किनारा मार्गावरून बेस्टची ए ७८ क्रमांकाची एसी बस धावते. ही बस भायखळा रेल्वे स्थानक पश्चिम ते कुलाबा बस आगारापर्यंत धावते. सातरस्ता, महालक्ष्मी स्थानक, हाजी अली, ब्रीच कॅण्डी, भुलाभाई देसाई रोड, सागरी किनारा मार्ग, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट स्थानकाहून ही बस पुढे जाते. मात्र या बसला सागरी किनारा मार्गावर थांबा नाही. या बसच्या सोमवार ते शुक्रवार १९ फेऱ्या आणि रविवारी काही मोजक्याच फेऱ्या होतात.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव मुंबई : ज्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश, बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू

Mumbai Metropolitan Region : मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम

महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

Eknath Shinde Opretion Tiger : 'उबाठा'च्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?

'ऑपरेशन टायगर'ला पुन्हा वेग; ९ पैकी ८ खासदार हजर असल्याची चर्चा मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा'

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच