एका क्लिकवर मिळणार जात प्रमाणपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संबंधित विभागाला निर्देश


मुंबई:जात प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयांचे चकरा, वेळखाऊ प्रक्रिया आणि कागदपत्रांची डोंगराएवढी झळती यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः नाकीनऊ होते. मात्र, हे चित्र लवकरच बदलणार आहे. कारण, महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र ऑनलाइन प्रणालीसाठी हिरवा कंदील दिला असून, लवकरच ही सुविधा प्रत्यक्षात येणार आहे.


राज्य सरकारने मान्यता दिलेल्या या नव्या संगणकीकृत प्रणालीतून अर्जदार एका क्लिकवर जात प्रमाणपत्र मिळवू शकणार आहे. ही प्रणाली पारदर्शक, जलद आणि अत्याधुनिक असेल. यासाठी बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी संयुक्तपणे प्रस्तावित प्रणाली विकसित केली आहे. यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सर्व संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.


नव्या प्रणालीमधील ठळक वैशिष्ट्ये:




  • एआय आधारित इंटरफेस - अर्जदाराला प्रत्येक

  • टप्प्यावर मार्गदर्शन करणारे स्मार्ट यूजर इंटरफेस.

  • ऑटो पडताळणी - अर्जदाराचे नाव, नातेवाइकांची माहिती आणि आधारवरील पत्ता प्रणालीद्वारे थेट पडताळला जाणार.

  • डीजी लॉकर एकत्रिकरण - कागदपत्रे थेट DigiLocker वरून घेतली जाणार, त्यामुळे वेग आणि विश्वासार्हता वाढणार.

  • विलंबाला चाप - सद्य:स्थितीत महिन्यांपर्यंत चालणारी प्रक्रिया, काही तासांत पूर्ण होण्याची शक्यता.

Comments
Add Comment

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

मुंबईत अग्निवीरानेच रायफल चोरली, कारण काय? दोघांना तेलंगणात अटक

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराची (नेव्ही कर्मचारी) रायफल चोरणाऱ्या दोन फरार

दसरा मेळाव्यासाठी मुंबई मनपाकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी

गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सागरी प्रदर्शन व परिषदेचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

पुढील तीन दिवसात नवनवीन भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन   मुंबई:

अजितदादांना झालेय तरी काय? आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द...

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार हे काल पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीत