पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोन करून मोदींना बैठकीचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता कॅनडात होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांच्यात फोनवरून संभाषण झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्नी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी कार्नी यांनी पंतप्रधान मोदींनी या महिन्याच्या अखेरीस कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.


याबाबत माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, ‘कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.’


पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, ‘जिवंत लोकशाही आणि लोकांमधील खोल संबंधांनी जोडलेले भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि सामाजिक हितसंबंधांच्या आधारे नवीन ऊर्जेने एकत्र काम करतील. मी शिखर परिषदेत पंतप्रधान कार्नी यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.’

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर