पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

  61

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोन करून मोदींना बैठकीचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता कॅनडात होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांच्यात फोनवरून संभाषण झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्नी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी कार्नी यांनी पंतप्रधान मोदींनी या महिन्याच्या अखेरीस कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.


याबाबत माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, ‘कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.’


पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, ‘जिवंत लोकशाही आणि लोकांमधील खोल संबंधांनी जोडलेले भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि सामाजिक हितसंबंधांच्या आधारे नवीन ऊर्जेने एकत्र काम करतील. मी शिखर परिषदेत पंतप्रधान कार्नी यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.’

Comments
Add Comment

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी

भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी