मुलगी झाली म्हणून चक्क १५ दिवस उपाशीपोटी डांबून ठेवले, पुण्यात आणखीन एका विवाहितेवर अत्याचार

सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात मुलगी झाली म्हणून विवाहितेवर अमानुष छळ 


बीड: मुलगी जन्माला आली म्हणून एका महिलेला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात राहणारी शिवानी चंदनदिवे या महिलेला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरच्यांकडून अमानुष छळ सहन करावा लागला. अखेर हतबल आणि निराश होऊन तिने आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन बीड येथे आपल्या माहेरचा आसरा घेतला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत शिवानीने आपल्या सासरच्यांविरुद्ध तक्रार केली आहे.  याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मुलगी जन्माला घातली म्हणून अमानुष छळ 


बीड येथील शिवानीचा विवाह पुण्यातील पिंपळा सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला. लग्नाचे काही वर्ष चांगले गेले. यादरम्यान शिवानी गर्भवती राहिली आणि तिने मुलीला जन्म दिला. मात्र मुलगी झाली म्हणून शिवानीच्या पतीसह सासू - सासरा आणि दिराने तीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. शिवानीला एका खोलीत उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आले. मात्र संधी मिळताचा शिवानीने बाळाला घेऊन सासर सोडले आणि बीड येथे आपल्या माहेरी आश्रयाला गेली.



सासू-सासर्‍यासह पति व दिरावर गुन्हा


या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे.  शिवानीसोबत घडलेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याचा निर्धार घेतला आहे.


पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना, आता मुलगी झाली म्हणून एका विवाहितेचा असा अमानुष छळ चक्रावून टाकणारा आहे. या घटनेने सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्याला आणखीन एक कलंक लागला आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात बांधकामस्थळी अल्पवयीन मुलाचा अपघाती मृत्यू; पोलिसांकडून चौकशी सुरू

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

पक्ष विलीकरणाच्या चर्चा, तरीही सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा ठरला; मोदी-शहांची लवकरच होणार भेट

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झाले. आणि प्रश्न निर्माण

CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पूर्व उपनगराला १८ वर्षांनंतर लाभला महापौर

मुंबई :  मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या