पूर्व उपनगराला १८ वर्षांनंतर लाभला महापौर

मुंबई :  मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. येत्या बुधवारी या निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाईल. रितू तावडे या पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व भागातील असून तावडे यांच्या रुपातून पश्चिम उपनगराला तब्बल १८ वर्षांनंतर महापौर लाभणार आहे. यापूर्वी सन २००५-०७ या कालावधीत पूर्व उपनगरातून दत्ता दळवी हे शेवटचे महापौर झाले होते.


मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.. यासाठी शनिवारी ०७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध असल्यामुळे महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड होणार आहे . रितू तावडे यांच्या रुपात पूर्व उपनगराला तब्बल १८ ते २० वर्षांनी महापौर लाभला आहे. सन १९९६-९७ पासून सन २०२२ पर्यंत तत्कालिन शिवसेनेचे महापौर निवडून येत असून या कालावधीमध्ये एकमेव महापौर हा पूर्व उपनगरातील लाभला आहे. सन २००५- २००७मध्ये पूर्व उपनगरातील विक्रोळीतील नगरसेवक दत्ता दळवी यांची निवड करण्यात आली होती. या कालावधीमध्ये सात महापौर हे शहर भागातील होते . तर तीन महापौर हे पश्चिम उपनगरातील होते.


काँग्रेसच्या सन १९९२ ते ९७च्या काळातील चार महापौरांपैंकी चारही महापौर पनगरातील होते.. यामध्ये तीन महापौर पूर्व उपनगराचे आणि एक महापौर पश्चिम उपनगरातील होते.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

मुंबई: महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र

Chief Minister Devendra Fadnavis : मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार

मुंबई : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

FIFA2026 : फिफा विश्वचषक २०२६: मैदानावर भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा

FIFA World Cup 2026 : फुटबॉलच्या महाकुंभात, म्हणजेच २०२६ फिफा विश्वचषकात केवळ देशच एकमेकांविरुद्ध लढत नाहीत, तर विविध

Amravati : १७ पैकी ४ मतदारसंघात 'मविआ' निवडणुकीआधीच स्पर्धेबाहेर

अमरावतीत शिवसेनेच्या बंडखोराचा अर्ज बाद; नाशिकमध्ये 'उबाठा'कडून शरणागती मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य

Labor Minister Adv. Akash Fundkar : राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी न होण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

मुंबई : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून

Minister Radhakrishna Vikhe-Patil : प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'मराठा आरक्षण कक्ष' स्थापन करणार

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील; न्यायमूर्ती शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई : मराठा आरक्षणाच्या