IT Engineer Suicide: २५ वर्षीय IT इंजिनीयरने २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवले जीवन

पुणे : महाराष्ट्रातील हिंजवडी भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या आयटी इंजिनीयर युवतीने एका २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून, तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हिंजवडी येथील क्राउन ग्रीन्स सोसायटीमध्ये पोहोचली. तेथील CCTV फुटेजमध्ये तिने आपला चेहरा कपड्याने बांधून घेत लिफ्टने २१व्या मजल्यावर जाताना दिसली. त्यानंतर पहाटे ४:४२ वाजता तिने इमारतीवरून खाली उडी घेतली.



अभिलाषाच्या घरी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?


पोलिसानी केलेल्या तपासणीत अभिलाषाच्या घरात आत्महत्या पूर्वी तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली, ज्यात "कृपया मला माफ करा. मी हे माझ्या इच्छेने करत आहे. आता जगण्याची काहीच इच्छा राहिलेली नाही." असे लिहिलेले होते. या नोटमध्ये तिने आत्महत्येचे कारण लिहिले नाही. त्यामुळे, नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे,


 


प्राथमिक तपासात काय आढळून आले?


पोलिसांनी  केलेल्या प्राथमिक तपासातून असे स्पष्ट होत आहे की, ती अनेक महीने नैराश्याचा सामना करत होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत निष्कर्ष पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. अभिलाषा मूळची महाराष्ट्रातीलच असून, IT कंपनीत नोकरी करत होती.



गंभीर दुखापतीमुळे मृत्यू


पोस्टमार्टम अहवालानुसार, तिच्या शरीरातील विविध भागांमध्ये गंभीर दुखापती झाल्या होत्या, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोराट यांनी सांगितले की, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही संशयास्पद बाब किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप तपासात आढळून आलेली नाही. घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

Noida Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिले विमान कधी उड्डाण घेईल?, जाणून घ्या बुकिंग कधी सुरू होईल? आणि ही सेवा कोणत्या शहरांसाठी सुरू केली जाईल?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. ११

अमेरिकी सैनिकांना शवपेट्यांमध्ये पाठवणार; इराणची अमेरिकेला धमकी

नवी दिल्ली: इराणच्या इंग्रजी दैनिक 'तेहरान टाइम्स'च्या पहिल्या पानावर आज 'नरकात आपले स्वागत आहे' (Welcome To Hell) या

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर