IT Engineer Suicide: २५ वर्षीय IT इंजिनीयरने २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवले जीवन

पुणे : महाराष्ट्रातील हिंजवडी भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या आयटी इंजिनीयर युवतीने एका २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून, तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हिंजवडी येथील क्राउन ग्रीन्स सोसायटीमध्ये पोहोचली. तेथील CCTV फुटेजमध्ये तिने आपला चेहरा कपड्याने बांधून घेत लिफ्टने २१व्या मजल्यावर जाताना दिसली. त्यानंतर पहाटे ४:४२ वाजता तिने इमारतीवरून खाली उडी घेतली.



अभिलाषाच्या घरी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?


पोलिसानी केलेल्या तपासणीत अभिलाषाच्या घरात आत्महत्या पूर्वी तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली, ज्यात "कृपया मला माफ करा. मी हे माझ्या इच्छेने करत आहे. आता जगण्याची काहीच इच्छा राहिलेली नाही." असे लिहिलेले होते. या नोटमध्ये तिने आत्महत्येचे कारण लिहिले नाही. त्यामुळे, नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे,


 


प्राथमिक तपासात काय आढळून आले?


पोलिसांनी  केलेल्या प्राथमिक तपासातून असे स्पष्ट होत आहे की, ती अनेक महीने नैराश्याचा सामना करत होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत निष्कर्ष पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. अभिलाषा मूळची महाराष्ट्रातीलच असून, IT कंपनीत नोकरी करत होती.



गंभीर दुखापतीमुळे मृत्यू


पोस्टमार्टम अहवालानुसार, तिच्या शरीरातील विविध भागांमध्ये गंभीर दुखापती झाल्या होत्या, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोराट यांनी सांगितले की, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही संशयास्पद बाब किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप तपासात आढळून आलेली नाही. घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या

Navi Mumbai Airport : एअरपोर्ट ते घर, आता प्रवास होईल सुखकर! नवी मुंबई एअरपोर्टवर विशेष 'प्रीपेड काउंटर' सज्ज; आता भाड्यासाठी घासाघीस नको

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी अडीच एकर जमीन देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई :

कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचे १५ उमेदवार बिनविरोध विजयी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले

इलेक्ट्रॉनिक्स ECMS योजनेतील तिसऱ्या ४१८६३ कोटींच्या टप्प्याला सरकारकडून मान्यता

नवी दिल्ली: भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था (Ecosystem) मजबूत करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण

Maharashtra Government Update: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सौरऊर्जेचा मोठा निर्णय, घराघरांत स्वयंपूर्ण वीज, खर्चात बचत शक्य

प्रतिनिधी: सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सरकार आग्रही असताना नव्या निर्णयात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या