IT Engineer Suicide: २५ वर्षीय IT इंजिनीयरने २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवले जीवन

पुणे : महाराष्ट्रातील हिंजवडी भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या आयटी इंजिनीयर युवतीने एका २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून, तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हिंजवडी येथील क्राउन ग्रीन्स सोसायटीमध्ये पोहोचली. तेथील CCTV फुटेजमध्ये तिने आपला चेहरा कपड्याने बांधून घेत लिफ्टने २१व्या मजल्यावर जाताना दिसली. त्यानंतर पहाटे ४:४२ वाजता तिने इमारतीवरून खाली उडी घेतली.



अभिलाषाच्या घरी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?


पोलिसानी केलेल्या तपासणीत अभिलाषाच्या घरात आत्महत्या पूर्वी तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली, ज्यात "कृपया मला माफ करा. मी हे माझ्या इच्छेने करत आहे. आता जगण्याची काहीच इच्छा राहिलेली नाही." असे लिहिलेले होते. या नोटमध्ये तिने आत्महत्येचे कारण लिहिले नाही. त्यामुळे, नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे,


 


प्राथमिक तपासात काय आढळून आले?


पोलिसांनी  केलेल्या प्राथमिक तपासातून असे स्पष्ट होत आहे की, ती अनेक महीने नैराश्याचा सामना करत होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत निष्कर्ष पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. अभिलाषा मूळची महाराष्ट्रातीलच असून, IT कंपनीत नोकरी करत होती.



गंभीर दुखापतीमुळे मृत्यू


पोस्टमार्टम अहवालानुसार, तिच्या शरीरातील विविध भागांमध्ये गंभीर दुखापती झाल्या होत्या, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोराट यांनी सांगितले की, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही संशयास्पद बाब किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप तपासात आढळून आलेली नाही. घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला आहे. भारताने

पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक

मुंबई : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत

ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने ईशान, सूर्या, शिवम,

दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा तातडीने शोध घेण्याचे, पोलीस उपायुक्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आराखड्याची होणार मांडणी

मुंबई : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या आर्थिक