IT Engineer Suicide: २५ वर्षीय IT इंजिनीयरने २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवले जीवन

पुणे : महाराष्ट्रातील हिंजवडी भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या आयटी इंजिनीयर युवतीने एका २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून, तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हिंजवडी येथील क्राउन ग्रीन्स सोसायटीमध्ये पोहोचली. तेथील CCTV फुटेजमध्ये तिने आपला चेहरा कपड्याने बांधून घेत लिफ्टने २१व्या मजल्यावर जाताना दिसली. त्यानंतर पहाटे ४:४२ वाजता तिने इमारतीवरून खाली उडी घेतली.



अभिलाषाच्या घरी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?


पोलिसानी केलेल्या तपासणीत अभिलाषाच्या घरात आत्महत्या पूर्वी तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली, ज्यात "कृपया मला माफ करा. मी हे माझ्या इच्छेने करत आहे. आता जगण्याची काहीच इच्छा राहिलेली नाही." असे लिहिलेले होते. या नोटमध्ये तिने आत्महत्येचे कारण लिहिले नाही. त्यामुळे, नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे,


 


प्राथमिक तपासात काय आढळून आले?


पोलिसांनी  केलेल्या प्राथमिक तपासातून असे स्पष्ट होत आहे की, ती अनेक महीने नैराश्याचा सामना करत होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत निष्कर्ष पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. अभिलाषा मूळची महाराष्ट्रातीलच असून, IT कंपनीत नोकरी करत होती.



गंभीर दुखापतीमुळे मृत्यू


पोस्टमार्टम अहवालानुसार, तिच्या शरीरातील विविध भागांमध्ये गंभीर दुखापती झाल्या होत्या, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोराट यांनी सांगितले की, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही संशयास्पद बाब किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप तपासात आढळून आलेली नाही. घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

कुठे काका विरुद्ध पुतण्या, तर कुठे दादा, भावजयी रणांगणात

नगर परिषद निवडणुकीत ‘घर घर की कहानी’ गाजणार मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे.