Konkan Railway : कोकणवासीयांसाठी दिलासा! गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची कार 'रो रो' सेवा होणार सुरु

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे रो रो सेवेमधून आता ट्रक प्रमाणे चारचाकी कार गाड्यांची ही रो रो सेवा सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासनाने सुरु केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासाठी दिलासा देणारी बातमी आहे. कोकण रेल्वे कडून गणेशोत्सवापूर्वी रो रो सेवा सुरू केली जाणार आहे. रेल्वेवर स्वताची गाडी चढवून थेट कोकणात जाणे शक्य होणार आहे.


कोकण रेल्वे मार्गावर ज्या प्रकारे रेल्वेकडून ट्रकची वाहतूक केली जाते त्याचप्रमाणे आता कारची देखील वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच या कारमधून प्रवाशांना प्रवास करणेसुद्धा शक्य होणार आहे. कोकण रेल्वेची ही सेवा गणेशोत्सवात प्रायोगिक तत्वावर मुंबई ते गोवा दरम्यान सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.



गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे, महामंडळाच्या बससेवा आणि रेल्वेला ऐनवेळी बुकिंग मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी एक पर्याय म्हणून कार वाहतूक सुरु झाल्यास कोकणवासीयांना याचा मोठा फायदा होणार आहे.



गणेशोत्सवापूर्वी ही सेवा होणार सुरु


कोकण रेल्वेने वॅगन ट्रकच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र कारच्या वाहतुकीसाठी वॅगन तयार करण्यासाठी काही तात्रिंक बाबींवर काम करण्याची गरज असल्याचे मत कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. येत्या गणपती उत्सवात ही सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे कोकण प्रशासना कडून सांगण्यात येत आहे. अशाप्रकारची सेवा कोलाड आणि मंगळुरु मार्गावर सुरु आहे. कोलाड येथे वाहनांना रेल्वेत चढविले जाते. अशा वाहनातील चालक, क्लिनर (असल्यास) आणि इतरांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा लागतो. मात्र कोकण मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाल्यास याचा कार वहातुकदार व प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे.


Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे