​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून ओळखला जाणा​ऱ्या या महामार्गामुळं कमी वेळात इच्छित स्थळी पोहचता येतंय. हे जरी खरं असलं तरी​ दिवसेंदिवस या महामार्गावर वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या घ​टना चिंता वाढवत आहे​त. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता दरवर्षी सरासरी ६५ ते १०० पर्यंत निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. जागोजागी अनियंत्रित उतार, टोकदार वळणे आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.​ सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळं चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत वाहनं चालवायला हवीत.

​०२ जून २०२५ च्या पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही शिवशाही बस बोईसर येथून कोल्हापूरकडे जात होती. या अपघातात बसमधील चालक, वाहक यांच्यासह एकूण १३ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. त्या आधी २४ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत तीव्र उतारावर अनेक वाहने एकमेकांना धडकली. ज्यात तीन कार तीन बसेस आणि एका ट्रकचा समावेश होता. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले. यामुळं महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. अशा दर दोन चार दिवसांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांच्या बातम्या आपण पाहतोय. महामार्ग पाेलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार वर्षाकाठी सरासरी दीडशे ते दोनशेच्या घरात अपघात होतात. यातील मृतांची संख्या सरासरी ६५ ते 100 असते. तर गंभीर जखमी होणार्‍यांची संख्याही तेवढीच असते. २०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ११ निष्पाप प्रवाशांचे बळी गेलेले आहेत.

कोणत्या वर्षांत किती अपघाती मृत्यू झाले?


२०२१ - ८८ 88
२०२२ - ९२
२०२३ - ६५
२०२४ - ९०
२०२५ ​म​ध्ये ३० एप्रिलपर्यंत​ ११ जणांचे बळी गेलेले आहेत.

काय आहेत अपघातांची कारणं ?



  • निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणं

  • सीट बेल्ट न लावता ड्रायव्हिंग करणं

  • फलकावर लावलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत

  • वाहनांची वेळेत देखभाल, दुरुस्ती केलेली नसते

  • क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते

  • एक्सप्रेसवेवर अनधिकृतरित्या पार्किंग केली जाते

  • ओव्हरटेकिंग प्रयत्न करताना अपघात होतात

  • पावसाळ्यात धुके असतानाही गाड्या रस्त्यावर उतरवणे.


सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळं महामार्गावर वाहनाचा वेग मर्यादेत हवा. अन्यथा वेगात असलेलं वाहन अचानक ब्रेक दाबावं लागल्यावर घसरून अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण गरजेचं आहे.
Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा