पुण्यात चाललंय काय ? पतीची आत्महत्या, पत्नीला अटक

पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात हुंडाबळीच्या संशयावरुन हगवणे कुटुंबाची कसून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील कोरेगाव मूल परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात एका तरुणाने गळफास घेतला. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. पत्नी मानसिक त्रास देत असल्याने पतीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर व्हिडीओ बनवून आपला त्रास कथन केल्याचे वृत्त आहे.


सूरज दामोदर पवार (वय ३२, रा. इनामदार वस्ती चिंतामणी हॉस्पिटल, जेधे चाळ, कोरेगावमूळ ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाचे वडील दामोदर निवृत्ती पवार (वय ६०, व्यवसाय-शेती, रा. वाल्हे, वागदरवाडी ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. त्याआधारे सूरजची पत्नी मयुरी सूरज पवार (वय २६) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.


काय प्रकरण आहे?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज पवार आणि मयुरी जाधव यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते मूळचे कोरेगाव येथील इनामदार वस्तीत राहत होते. मात्र, बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याचे वृत्त आहे.


मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग


पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून सूरजने घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. हे चित्रीकरण त्यांनी मोबाईलमध्ये केले होते. पत्नी मयुरीकडून होणारा मानसिक छळ, मारामारी आणि मारहाणीमुळे सूरजने आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येला पत्नी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.मयुरी पवार उर्फ मयुरी जाधव हिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, बीएनएस कलम १०८, ११८ (१), ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पुण्यातील पवार कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)