'सितारे जमीन पर’चा 'टायटल ट्रॅक' प्रदर्शित आमिर-जेनेलियाची नव्या रंगात 'केमिस्ट्री'

  93

मुंबई : आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आला असून, त्यानंतर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अजूनच उधाण आलं आहे.


या चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत झळकणार असून, गाण्यात त्याचा आणि लहान मुलांमधील भावनिक नातं सुंदररीत्या दाखवलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिनेत्री जेनेलिया देशमुखसोबत आमिरची नव्या अंगानं साकारलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरते.


चित्रपटात १० नवोदित बालकलाकारांनी काम केलं असून, त्यांच्या सादरीकरणामुळे चित्रपटाला एक ताजेपणाचा स्पर्श मिळाला आहे. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय यांचं हृदयस्पर्शी संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांची भावपूर्ण गीतं लाभली आहेत.


‘तारे जमीन पर’ या सुपरहिट चित्रपटाचा हा सामाजिक संदेश असलेला सिक्वल प्रेक्षकांसमोर २० जून २०२५ रोजी चित्रपटगृहात येणार आहे. आता या गाण्यानं चित्रपटाच्या प्रतीक्षेचं वातावरण आणखीच वाढवले आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल