दिल्लीतील कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या

  54

नवी दिल्ली : दिल्ली येथील साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना आज घडली. अन्य दोन कैद्यांनी अमन नावाच्या कैद्याची हत्या केली. दोघेही तिहार तुरुंग क्रमांक ८ मध्ये कारावासाची शिक्षा भोगत होते. दोघांनाही न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणी अटकेत असणार्या दोघांना न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांना साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. साकेत कोर्ट लॉकअपच्या खारजा क्रमांक ५ मध्ये मारहाणीची घटना घडली. एका अमनला न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपमध्ये आणण्यात आले होते. जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.


२०२४ मध्ये तुरुंगाबाहेर असताना झालेल्या मारहणाीच्या घटनेमुळे जितेंद्र आणि अमन यांच्यात जुना वैमनस्य होते. अमनने जितेंद्र आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप होता. याच पूर्ववैमनस्यातून जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांनी दिले होते.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली