दिल्लीतील कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या

नवी दिल्ली : दिल्ली येथील साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना आज घडली. अन्य दोन कैद्यांनी अमन नावाच्या कैद्याची हत्या केली. दोघेही तिहार तुरुंग क्रमांक ८ मध्ये कारावासाची शिक्षा भोगत होते. दोघांनाही न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणी अटकेत असणार्या दोघांना न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांना साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. साकेत कोर्ट लॉकअपच्या खारजा क्रमांक ५ मध्ये मारहाणीची घटना घडली. एका अमनला न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपमध्ये आणण्यात आले होते. जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.


२०२४ मध्ये तुरुंगाबाहेर असताना झालेल्या मारहणाीच्या घटनेमुळे जितेंद्र आणि अमन यांच्यात जुना वैमनस्य होते. अमनने जितेंद्र आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप होता. याच पूर्ववैमनस्यातून जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांनी दिले होते.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड