दिल्लीतील कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या

नवी दिल्ली : दिल्ली येथील साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना आज घडली. अन्य दोन कैद्यांनी अमन नावाच्या कैद्याची हत्या केली. दोघेही तिहार तुरुंग क्रमांक ८ मध्ये कारावासाची शिक्षा भोगत होते. दोघांनाही न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणी अटकेत असणार्या दोघांना न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांना साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. साकेत कोर्ट लॉकअपच्या खारजा क्रमांक ५ मध्ये मारहाणीची घटना घडली. एका अमनला न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपमध्ये आणण्यात आले होते. जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.


२०२४ मध्ये तुरुंगाबाहेर असताना झालेल्या मारहणाीच्या घटनेमुळे जितेंद्र आणि अमन यांच्यात जुना वैमनस्य होते. अमनने जितेंद्र आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप होता. याच पूर्ववैमनस्यातून जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांनी दिले होते.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे