शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वितेसाठी नियोजन करावे

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले निर्देश


अलिबाग : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार ९ जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होणार असल्याने या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.


रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ च्या आनुषंगाने नियोजन बैठक नुकतीच पार पडली, त्यावेळी विभागीय आयुक्त सूर्यवंशी बोलत होते. सूर्यवंशी पुढे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगडावर येत असतात. यावर्षी होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात असून, मागीलवर्षी सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये, यादृष्टीने आवश्यकत्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी.


येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सूचित केले, तसेच महाड व माणगावमार्गे येणाऱ्या खासगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे, आवश्यक माहिती देणारे फलक लावले जावेत असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रवींद्र शेळके, यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने