शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वितेसाठी नियोजन करावे

  133

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले निर्देश


अलिबाग : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार ९ जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होणार असल्याने या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.


रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ च्या आनुषंगाने नियोजन बैठक नुकतीच पार पडली, त्यावेळी विभागीय आयुक्त सूर्यवंशी बोलत होते. सूर्यवंशी पुढे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगडावर येत असतात. यावर्षी होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात असून, मागीलवर्षी सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये, यादृष्टीने आवश्यकत्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी.


येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सूचित केले, तसेच महाड व माणगावमार्गे येणाऱ्या खासगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे, आवश्यक माहिती देणारे फलक लावले जावेत असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रवींद्र शेळके, यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात