श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

  87

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने सहकारी खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रलोभन दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्याला अटक झाली होती, पण २०२३ मध्ये जामिनावर सुटका झाली. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे.


श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता हंबनटोटा हायकोर्टाने त्याला मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवले आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने एका सहकारी खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रलोभन दिल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.


अटॉर्नी जनरलच्या विभागाने सांगितले की, श्रीलंकेत अलीकडेच लागू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगसाठीचा हा पहिलाच खटला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सेनानायकेने कोलंबो किंग्सकडून खेळणाऱ्या थारिंदु रत्नायकेला फिक्सिंगची ऑफर दिली होती.


२०१४ साली श्रीलंकेने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा त्या विजयी संघात सचित्रा सेनानायके यांचा समावेश होता. ४० वर्षीय सेनानायके यांनी २०१३ ते २०१६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात त्यांनी श्रीलंकेकडून ४९ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी ५३ विकेट्स घेतल्या, तर टी-२० मध्ये त्यांनी २५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तो आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. २०२३ च्या हंगामात तो केकेआर संघाचा सदस्य होता.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट