जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अडीचपट कैदी

प्रशासनावर कामाचाताण; यंत्रणा अपुरी


अलिबाग  :रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ झाल्याने कैद्यांना ठेवण्यासाठी अलिबागचे जिल्हा कारागृह अपुरे पडू लागले आहे. ८२ कैद्यांना ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जिल्हा कारागृहात सध्या २०२ कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहेत. यामुळे कैद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, कारागृह प्रशासनावरही कामाचा ताण पडत असून, यंत्रणा अपुरी पडत आहे.


अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्याचे रूपांतर जिल्हा कारागृहात करण्यात आले आहे. या कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींना ठेवण्यात येते. या कारागृहात ८० पुरुष व २ महिला असे ८२ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे हे कारागृह कमी पडत आहे. जिल्ह्यात दररोज ८ ते १० गुन्हे घडत आहेत. यामुळे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या जिल्हा कारागृहात १९१ पुरुष व ११ महिला कैदी असे एकूण २०२ कैदी ठेवण्यात
आले आहेत.


कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैद्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोंडत वातावरण, खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहावे लागत आहे. शौचालय, तसेच स्नानगृहांची कमतरताही भेडसावत आहे. याचबरोबर प्रशासनावरही ताण पडत आहे. ८२ कैद्यांसाठी पूरक असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२ कैद्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे. जिल्हा कारागृहात केवळ दोन महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात ११ महिला कैदी आहेत.


या सर्व ११ महिला कैद्यांसाठी केवळ एक बराक असून या बराकीत दाटीवाटीने त्यांना राहावे लागत आहे, तसेच महिला कैद्यांसाठी केवळ एक स्नानगृह आहे. यामुळेही महिला कैद्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरुष कैद्याचीही अशीच परिस्थिती आहे. १९२ कैद्यांना एक मोठी बराक, तसेच ८ छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे.


हिराकोट किल्ल्याचे रुपांतर कारागृहात करण्यात आले आहे. यामुळेही कारागृह प्रशासनाला अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत आहे. किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. यामुळे कारागृहात काही काम करावयाचे असल्यास पुरातत्त्व विभागाची परवानगी लागते. तसेच किल्ल्याच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागत आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.