जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अडीचपट कैदी

प्रशासनावर कामाचाताण; यंत्रणा अपुरी


अलिबाग  :रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ झाल्याने कैद्यांना ठेवण्यासाठी अलिबागचे जिल्हा कारागृह अपुरे पडू लागले आहे. ८२ कैद्यांना ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जिल्हा कारागृहात सध्या २०२ कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहेत. यामुळे कैद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, कारागृह प्रशासनावरही कामाचा ताण पडत असून, यंत्रणा अपुरी पडत आहे.


अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्याचे रूपांतर जिल्हा कारागृहात करण्यात आले आहे. या कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींना ठेवण्यात येते. या कारागृहात ८० पुरुष व २ महिला असे ८२ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे हे कारागृह कमी पडत आहे. जिल्ह्यात दररोज ८ ते १० गुन्हे घडत आहेत. यामुळे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या जिल्हा कारागृहात १९१ पुरुष व ११ महिला कैदी असे एकूण २०२ कैदी ठेवण्यात
आले आहेत.


कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैद्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोंडत वातावरण, खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहावे लागत आहे. शौचालय, तसेच स्नानगृहांची कमतरताही भेडसावत आहे. याचबरोबर प्रशासनावरही ताण पडत आहे. ८२ कैद्यांसाठी पूरक असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२ कैद्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे. जिल्हा कारागृहात केवळ दोन महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात ११ महिला कैदी आहेत.


या सर्व ११ महिला कैद्यांसाठी केवळ एक बराक असून या बराकीत दाटीवाटीने त्यांना राहावे लागत आहे, तसेच महिला कैद्यांसाठी केवळ एक स्नानगृह आहे. यामुळेही महिला कैद्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरुष कैद्याचीही अशीच परिस्थिती आहे. १९२ कैद्यांना एक मोठी बराक, तसेच ८ छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे.


हिराकोट किल्ल्याचे रुपांतर कारागृहात करण्यात आले आहे. यामुळेही कारागृह प्रशासनाला अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत आहे. किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. यामुळे कारागृहात काही काम करावयाचे असल्यास पुरातत्त्व विभागाची परवानगी लागते. तसेच किल्ल्याच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी