जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अडीचपट कैदी

  38

प्रशासनावर कामाचाताण; यंत्रणा अपुरी


अलिबाग  :रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ झाल्याने कैद्यांना ठेवण्यासाठी अलिबागचे जिल्हा कारागृह अपुरे पडू लागले आहे. ८२ कैद्यांना ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जिल्हा कारागृहात सध्या २०२ कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहेत. यामुळे कैद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, कारागृह प्रशासनावरही कामाचा ताण पडत असून, यंत्रणा अपुरी पडत आहे.


अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्याचे रूपांतर जिल्हा कारागृहात करण्यात आले आहे. या कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींना ठेवण्यात येते. या कारागृहात ८० पुरुष व २ महिला असे ८२ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे हे कारागृह कमी पडत आहे. जिल्ह्यात दररोज ८ ते १० गुन्हे घडत आहेत. यामुळे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या जिल्हा कारागृहात १९१ पुरुष व ११ महिला कैदी असे एकूण २०२ कैदी ठेवण्यात
आले आहेत.


कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैद्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोंडत वातावरण, खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहावे लागत आहे. शौचालय, तसेच स्नानगृहांची कमतरताही भेडसावत आहे. याचबरोबर प्रशासनावरही ताण पडत आहे. ८२ कैद्यांसाठी पूरक असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२ कैद्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे. जिल्हा कारागृहात केवळ दोन महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात ११ महिला कैदी आहेत.


या सर्व ११ महिला कैद्यांसाठी केवळ एक बराक असून या बराकीत दाटीवाटीने त्यांना राहावे लागत आहे, तसेच महिला कैद्यांसाठी केवळ एक स्नानगृह आहे. यामुळेही महिला कैद्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरुष कैद्याचीही अशीच परिस्थिती आहे. १९२ कैद्यांना एक मोठी बराक, तसेच ८ छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे.


हिराकोट किल्ल्याचे रुपांतर कारागृहात करण्यात आले आहे. यामुळेही कारागृह प्रशासनाला अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत आहे. किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. यामुळे कारागृहात काही काम करावयाचे असल्यास पुरातत्त्व विभागाची परवानगी लागते. तसेच किल्ल्याच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागत आहे.

Comments
Add Comment

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात