भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार करण्यासाठी टाटा समुहासोबत भागिदारी करार केला आहे. लवकरच हैदाराबादमध्ये एक कारखाना उभारून त्याद्वारे राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग तयार केले जातील.

दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड यांनी भारतात राफेल लढाऊ विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन करण्यासाठी चार उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांमुळे भारताचे हवाई संरक्षण आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.

भारतात हवाई दलाकडे ३६ राफेल लढाऊ विमानांचा ताफा कार्यरत आहे. या व्यतिरिक्त भारताने नौदलासाठी २६ मरीन राफेल लढाऊ विमानांचा ताफा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व विमानांची देखभाल दुरुस्ती सहजतेने करता यावी यासाठी भारताला राफेलच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू शकते. भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे देशातच राफेलची निर्मिती करण्याबाबत नियोजन करत आहेत. या प्रकल्पालाही सुट्या भागांच्या निर्मितीमुळे मोठी मदत होणार आहे. यामुळेच राफेलच्या सुट्या भागांबाबतच्या कराराला महत्त्व आहे. हैदराबादमध्ये उभारला जाणार असलेला कारखाना भारताच्या विमान उद्योगाला चालना देण्यास मदत करेल.

भागीदारी करारांतर्गत टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स हैदराबादमध्ये राफेलच्या प्रमुख स्ट्रक्चरल सेक्शन्सच्या निर्मितीसाठी एक अत्याधुनिक कारखाना उभारणार आहे. या कारखान्यात विमानाच्या मागील फ्यूजलेजचे पार्श्व कवच, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूजलेज आणि पुढचा भाग यांची निर्मिती केली जाईल. पहिला फ्यूजलेज प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यरत होणार आहे. या कारखान्यामुळे दरमहा दोन पूर्ण फ्यूजलेज मिळतील.

हैदराबादच्या कारखान्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच, राफेल विमानांचे फ्यूजलेज फ्रान्सबाहेर तयार केले जातील. भारतातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हैदराबादचा कारखाना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Comments
Add Comment

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत