भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

  119

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार करण्यासाठी टाटा समुहासोबत भागिदारी करार केला आहे. लवकरच हैदाराबादमध्ये एक कारखाना उभारून त्याद्वारे राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग तयार केले जातील.

दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड यांनी भारतात राफेल लढाऊ विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन करण्यासाठी चार उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांमुळे भारताचे हवाई संरक्षण आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.

भारतात हवाई दलाकडे ३६ राफेल लढाऊ विमानांचा ताफा कार्यरत आहे. या व्यतिरिक्त भारताने नौदलासाठी २६ मरीन राफेल लढाऊ विमानांचा ताफा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व विमानांची देखभाल दुरुस्ती सहजतेने करता यावी यासाठी भारताला राफेलच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू शकते. भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे देशातच राफेलची निर्मिती करण्याबाबत नियोजन करत आहेत. या प्रकल्पालाही सुट्या भागांच्या निर्मितीमुळे मोठी मदत होणार आहे. यामुळेच राफेलच्या सुट्या भागांबाबतच्या कराराला महत्त्व आहे. हैदराबादमध्ये उभारला जाणार असलेला कारखाना भारताच्या विमान उद्योगाला चालना देण्यास मदत करेल.

भागीदारी करारांतर्गत टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स हैदराबादमध्ये राफेलच्या प्रमुख स्ट्रक्चरल सेक्शन्सच्या निर्मितीसाठी एक अत्याधुनिक कारखाना उभारणार आहे. या कारखान्यात विमानाच्या मागील फ्यूजलेजचे पार्श्व कवच, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूजलेज आणि पुढचा भाग यांची निर्मिती केली जाईल. पहिला फ्यूजलेज प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यरत होणार आहे. या कारखान्यामुळे दरमहा दोन पूर्ण फ्यूजलेज मिळतील.

हैदराबादच्या कारखान्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच, राफेल विमानांचे फ्यूजलेज फ्रान्सबाहेर तयार केले जातील. भारतातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हैदराबादचा कारखाना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके