भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार करण्यासाठी टाटा समुहासोबत भागिदारी करार केला आहे. लवकरच हैदाराबादमध्ये एक कारखाना उभारून त्याद्वारे राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग तयार केले जातील.

दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड यांनी भारतात राफेल लढाऊ विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन करण्यासाठी चार उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांमुळे भारताचे हवाई संरक्षण आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.

भारतात हवाई दलाकडे ३६ राफेल लढाऊ विमानांचा ताफा कार्यरत आहे. या व्यतिरिक्त भारताने नौदलासाठी २६ मरीन राफेल लढाऊ विमानांचा ताफा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व विमानांची देखभाल दुरुस्ती सहजतेने करता यावी यासाठी भारताला राफेलच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू शकते. भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे देशातच राफेलची निर्मिती करण्याबाबत नियोजन करत आहेत. या प्रकल्पालाही सुट्या भागांच्या निर्मितीमुळे मोठी मदत होणार आहे. यामुळेच राफेलच्या सुट्या भागांबाबतच्या कराराला महत्त्व आहे. हैदराबादमध्ये उभारला जाणार असलेला कारखाना भारताच्या विमान उद्योगाला चालना देण्यास मदत करेल.

भागीदारी करारांतर्गत टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स हैदराबादमध्ये राफेलच्या प्रमुख स्ट्रक्चरल सेक्शन्सच्या निर्मितीसाठी एक अत्याधुनिक कारखाना उभारणार आहे. या कारखान्यात विमानाच्या मागील फ्यूजलेजचे पार्श्व कवच, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूजलेज आणि पुढचा भाग यांची निर्मिती केली जाईल. पहिला फ्यूजलेज प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यरत होणार आहे. या कारखान्यामुळे दरमहा दोन पूर्ण फ्यूजलेज मिळतील.

हैदराबादच्या कारखान्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच, राफेल विमानांचे फ्यूजलेज फ्रान्सबाहेर तयार केले जातील. भारतातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हैदराबादचा कारखाना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Comments
Add Comment

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका