शासकीय कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी


मुंबई : शासकीय कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर सुरू असून, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने विजेची बचत करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येत असून सुद्धा अनेक शासकीय, महापालिका कार्यालयात वीज वाया घालण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. विजेची बचत करणे अधिकाऱ्यांची जबाबदार आहे. परंतु काही अधिकाऱ्यांकडून विजेची बचत होताना दिसत नसल्याने अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली आहे.



भांडुप (प.) येथील मनपा एस विभागातील रस्ते अभियंता तसेच इमारत व कारखाने या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या केबिनमधील संबंधित अधिकारी जागेवर नसताना सुद्धा लाईट, पंखा चालू असल्याचे समोर आले असून कामानिमित्त व इतर ठिकाणी जाण्यापूर्वी लाईट, पंखा बंद करून विजेची बचत करायची सोडून, वीज वाया घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वराडे यांनी मनपा एस विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याकडे केली  आहे.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास