आदिवासी घरकुल योजनेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा

डॉ. विजय सूर्यवंशी यांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश


अलिबाग: रायगड जिल्ह्यातील २० हजार ४८९ घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे, तसेच या योजनेतील पैसे लाभार्थींना अदा करण्याच्या प्रक्रीयेदरम्यान भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश कोकण विभागीय महसुल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रायगड जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.


रायगडमध्ये तब्बल २० हजार ४८९ घरकुलांच्या भूमिपुजनाचा सोहळा पार पडला. प्रधानमंत्री जनमन योजनेतून आदिवासी महिलांची घरकुले रायगडचे जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हातात कुदळ फावडे घेऊन ८ मार्च रोजी घरकुल बांधणीचा भूमी समारंभ केला, पण या घरकुलांमुळे पहिला हप्ता मिळाला, पण दुसऱ्या हप्त्याची प्रतिक्षा करीत बांधकामासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आदिवासींवर आली आहे. घरकुलाच्या बिलांमधील ग्रामसेवक व इंजिनियर यांना पाच हजार रुपये देऊन आदिवासी महिला अजून जास्त प्रकारे वेठबिगार होत आहेत अशी तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.


रायगडमधील ४० आदिवासी वाड्यांवरील आदिवासी महिला नेत्या नीरा मधे, संजय नाईक, भारती पवार, पप्पी वाघमारे, मुक्ता पवार, हिरा वाघमारे यांनी नेत्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवन येथे कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. आदिवासी महिलांच्या समस्यांचे गांभीर्य ओळखून अत्यंत संवेदनशीलता दाखवून डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ग्रामविकास विभाग, रोजगार हमी योजना, महिला बालकल्याण विभागाचे उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांची तातडीने बैठक बोलावून निर्णय घेतला.


रायगड जिल्ह्यात केवळ शासकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तांत्रिक कारण पुढे देऊन आजवर रोजगार हमीचे प्रत्येक घरकुलामागील २७ हजार रूपये याप्रमाणे तब्बल ५५ कोटी ३२ लाख रोजगाराची रक्कम लाभार्थींना अदा करण्यात आलेली नाही, तसेच पावसाळ्या आधी घरकुल पूर्ण करण्यासाठी आदिवासींनी मोठ्या प्रमाणात वीटभट्टी मालकांकडून मोठ्या व्याजदराने कर्ज काढले आहे. यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले.



महिलांच्या नावाने प्राधान्याने घरकुले मंजूर व्हावी


पूर्वीच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी वाढवून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, प्रत्येक घरकुल रोजगारापोटी रक्कम २७ हजार मिळावे, योजनेतील भ्रष्टाचार थांबवावा आणि महिलांच्या नावाने प्राधान्याने घरकुले मंजूर व्हावीत. सरकारी धोरणांची अंमलबजावणी करावी आदि मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी अंकुर ट्रस्टचे कार्यकर्ते सोपान निवळकर, मिनल सांडे, विद्यार्थी वेदिका दुखंडे व रामा बरड उपस्थित होते.

Comments
Add Comment

Matheran Heritage Mini-Train : माथेरानच्या हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी

माथेरान : ब्रिटिशकालापासून सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणांवरून धावणारी जगप्रसिद्ध माथेरानची

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Mumbai-Goa Express Highway : कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर