गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा, धनंजय मुंडे एकत्र

११ वर्षांनंतर गोपीनाथगडावर भावनिक क्षण


परळी : भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः मुंडे कुटुंबातील दोन महत्वाचे चेहरे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे तब्बल ११ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनास एकत्र मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही हजेरी लावल्याने एक भावनिक क्षण अनुभवण्यास मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी बहीण-भाऊ एकत्रजेवण करत होते.


कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, 'धनंजय यांनी मला सांगितले,‘आमच्यावतीने तूच बोल’, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे.' त्यांनी पुढे सांगितले की, 'मी एकटी नाही, माझ्या पाठीशी तुम्ही सगळे उभे आहात. ही एक कुटुंब व्यवस्था आहे. दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो, पण प्रत्येकवेळी वाटतं की आणखी काहीतरी करावं.' रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा सामाजिक उपक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडेंचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. 'त्यांना जर रक्त लागलं असतं, तर आपण कमी पडलो नसतो. म्हणूनच आजही आम्ही लोकांसाठी रक्तदान करत आहोत,'असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कार्याचा पुनःस्मरण करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. 'मुंडे साहेब आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते, त्यांनी फार मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची धडपड होती,' असे त्यांनी स्पष्ट केले.


'तुम्ही त्यांना शोधता कुठे, मला माहीत नाही; पण मी त्यांना तुमच्यामध्ये शोधते,'अशा शब्दांत त्यांनी उपस्थित जनतेशी आत्मीयतेने संवाद साधला. तसेच बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पांडवांना आणि रामाला देखील वनवास सहन करावा लागला होता, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असे कीर्तनात ऐकले, असेही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी उपस्थित सर्व लोकांना 'दोन घास खाऊनच जा' असे सांगून जेवणासाठी आग्रह केला. विशेष म्हणजे, यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकाच पंगतीत एकत्र जेवण केले. हा प्रसंग अनेक कार्यकर्त्यांना भावूक करणारा होता. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, त्यांनी भाषण न करता मौन राखले.

Comments
Add Comment

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना