गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा, धनंजय मुंडे एकत्र

११ वर्षांनंतर गोपीनाथगडावर भावनिक क्षण


परळी : भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः मुंडे कुटुंबातील दोन महत्वाचे चेहरे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे तब्बल ११ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनास एकत्र मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही हजेरी लावल्याने एक भावनिक क्षण अनुभवण्यास मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी बहीण-भाऊ एकत्रजेवण करत होते.


कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, 'धनंजय यांनी मला सांगितले,‘आमच्यावतीने तूच बोल’, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे.' त्यांनी पुढे सांगितले की, 'मी एकटी नाही, माझ्या पाठीशी तुम्ही सगळे उभे आहात. ही एक कुटुंब व्यवस्था आहे. दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो, पण प्रत्येकवेळी वाटतं की आणखी काहीतरी करावं.' रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा सामाजिक उपक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडेंचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. 'त्यांना जर रक्त लागलं असतं, तर आपण कमी पडलो नसतो. म्हणूनच आजही आम्ही लोकांसाठी रक्तदान करत आहोत,'असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कार्याचा पुनःस्मरण करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. 'मुंडे साहेब आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते, त्यांनी फार मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची धडपड होती,' असे त्यांनी स्पष्ट केले.


'तुम्ही त्यांना शोधता कुठे, मला माहीत नाही; पण मी त्यांना तुमच्यामध्ये शोधते,'अशा शब्दांत त्यांनी उपस्थित जनतेशी आत्मीयतेने संवाद साधला. तसेच बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पांडवांना आणि रामाला देखील वनवास सहन करावा लागला होता, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असे कीर्तनात ऐकले, असेही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी उपस्थित सर्व लोकांना 'दोन घास खाऊनच जा' असे सांगून जेवणासाठी आग्रह केला. विशेष म्हणजे, यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकाच पंगतीत एकत्र जेवण केले. हा प्रसंग अनेक कार्यकर्त्यांना भावूक करणारा होता. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, त्यांनी भाषण न करता मौन राखले.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन